शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रिक्षाचालकांना करून देणार कर्तव्याची जाणीव

By admin | Updated: September 22, 2015 03:40 IST

प्रवाशांना चांगली सेवा देणे, हे प्रथम कर्तव्य असतानादेखील बहुतेक रिक्षाचालक त्याला हरताळ फासून ठाणेकर प्रवाशांची लूट करीत आहेत.

अजित मांडके, ठाणेप्रवाशांना चांगली सेवा देणे, हे प्रथम कर्तव्य असतानादेखील बहुतेक रिक्षाचालक त्याला हरताळ फासून ठाणेकर प्रवाशांची लूट करीत आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने उचललेल्या एका पावलासोबत आता ठाणेकर प्रवाशांचे असंख्य पावले जोडली जाऊ लागली आहेत. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून त्यांना रिक्षाचालकांबरोबर आलेले अनुभव शेअर केले आहेत. त्यामुळे आता विनाकारण हॉर्न वाजविणे बंद कर, या मोहिमेनंतर ‘रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून दे’, या लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीला आणखी यश येऊ लागले आहे.‘काहीतरी कर ठाणेकर’ चळवळीला आता चांगलेच यश लाभण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी लोकमतच्या मोहिमेचे कौतुक केले असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नंबरवर अनेकांनी मेसेज टाकून त्यांना रिक्षाचालकांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा अनुभव शेअर केला आहे. तसेच त्यांना कशा पद्धतीने रिक्षाचालकांनी लुबाडले, भाडे कसे नाकारले, याचेही अनुभव कथन केले आहेत. तसेच काही रिक्षाचालकांनीही या नंबरवर फोन करून त्यांच्या व्यथाही मांडल्या आहेत. त्यामुळे आता घोडबंदर येथील एका गृहस्थाने त्यांना आलेला अनुभव शेअर करताना सांगितले की, मानपाड्याला रिक्षाने आलो असता, त्याला शंकर मंदिराकडे जाण्यास विनंती केली असता, त्याने जाण्यास नकार दिला. उलट, त्या ठिकाणी लांबून जावे लागेल, असे सांगून त्याने नकार दिला. त्याला शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अरेरावी सुरूकेली. ठाणे स्टेशन ते हरिनिवास सर्कलपर्यंत रिक्षाचालकाला सांगितले असता, त्याने रिक्षा रिकामी असतानाही येण्यास नकार दिल्याचे राजेश शिरोडकर यांनी सांगितले.रात्री ८ नंतर गावदेवी येथील एका रिक्षाचालकाला ओवळा येथे मीटरने येणार का, असे विचारले असता, त्याने थेट २०० रुपये होतील, असे सांगितले. मात्र, मीटरने येण्यास नकार दिल्याची माहिती दीपक जाधव यांनी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर शेअर केली आहे. अशा प्रकारे भाडे नाकारणे, जवळच्या ठिकाणी येण्यास नकार देणे, सायंकाळच्या वेळेस रिक्षा रिकाम्या असतानाही सीएनजी भरायचे असल्याचे कारण देत रिक्षाचालक येण्यास नकार देतात. काहींनी रिक्षाचालकांचे चांगले अनुभवही सांगितले आहेत. यात जवळचे अंतर असले तरी काहीही काचकूच न करता काही चालकांनी येण्यास तयारी दर्शविल्याचेही अनुभव प्रवाशांनी कथन केले आहेत.