शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

रिक्षाचालकांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:55 IST

सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे ही ओळख पुसली जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

नवी मुंबई : सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे ही ओळख पुसली जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. शहरातील प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर लागूनच प्रशस्त बस टर्मिनल्स, पार्किंग आणि रिक्षा-टॅक्सी स्टँडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही रेल्वे स्थानकाबाहेर पडताच प्रवाशांना रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाचा सामना करावा लागत आहे. स्थानकांबाहेर नियोजित रिक्षा तळ असून रिक्षांना व प्रवाशांना रांग लावण्याची व्यवस्था आहे. असे असूनही रिक्षाचालक प्रवासी मिळविण्याच्या चढाओढीत मनमानीपणे रिक्षा उभ्या करताना दिसून येतात.वाशी, सानपाडा, नेरुळ आदी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यात आपल्या रिक्षाला सर्वप्रथम भाडे मिळावे यासाठी रिक्षाचालक अगदी स्थानकांच्या तोंडावर आपल्या रिक्षा उभ्या करतात. पोलिसांच्या अनुपस्थितीत रिक्षाचालक आपल्या बेलगाम वागण्याने प्रवाशांना हैराण करून सोडतात. त्यातच शेअर आॅटो हा प्रवाशांच्या सोयीचा ठरणारा प्रवास वाहतुकीसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. ग्राहक मिळण्यासाठी बस,रेल्वे थांब्यांवरतीच रिक्षा आणून थांबविण्याचा प्रकार बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. संध्याकाळी लोकल आल्याने प्रवासी बाहेर पडताच, रिक्षाचालक प्रवाशांसाठी भर रस्त्यात रिक्षा थांबवतात.अनेकदा एखादा प्रवासी कमी असल्यास तो प्रवासी मिळेपर्यंत रिक्षाचालक रिक्षा जागेवरून हलवत नाहीत. मग त्यामुळे कितीही वाहतूककोंडी झाली तरी त्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यात रस्त्याच्या निम्म्या भागात काँक्र ीटीकरणाचे काम सरू असल्याने निम्माच रस्ता वापर योग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालणेही कठीण होत आहे. रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांची ही मुजोरी अधिक प्रमाणात दिसून येते. प्रवासी मिळवण्याच्या वादात अनेकदा रिक्षाचालकांतच भांडणे पाहायला मिळतात.