शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

परतीच्या पावसाचा दिलासा

By admin | Updated: November 22, 2015 00:49 IST

गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच

नवी मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडविली. सकाळपासूनच शहरातील वातावरणात बदल झाला असून, ऊन-सावलीचा खेळ आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पावसाने लावलेल्या या हजेरीमुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. सोबत छत्री नसल्याने प्रवाशांना पावसात भिजतच घर गाठावे लागले. दुचाकीस्वार, पादचाऱ्यांनी रस्त्याच्या आडोशाला उभे राहून पावसापासून बचाव केला. नवी मुंबईतील सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून तळी निर्माण झाली. वादळी वाऱ्याच्या या पावसामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळाले. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे तसेच अवकाळी पावसाने साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरींमुळे हवेत आणखीनच गारवा पसरला असून, शहरातील तापमानाचा पारा २५ अंशापर्यंत खालावल्याची नोंद हवामान खात्याने केली. पाऊस पडल्याने थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या हवेतील गारव्याने नवी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला.