शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

परतीच्या पावसाचा दिलासा

By admin | Updated: November 22, 2015 00:49 IST

गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच

नवी मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडविली. सकाळपासूनच शहरातील वातावरणात बदल झाला असून, ऊन-सावलीचा खेळ आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पावसाने लावलेल्या या हजेरीमुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. सोबत छत्री नसल्याने प्रवाशांना पावसात भिजतच घर गाठावे लागले. दुचाकीस्वार, पादचाऱ्यांनी रस्त्याच्या आडोशाला उभे राहून पावसापासून बचाव केला. नवी मुंबईतील सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून तळी निर्माण झाली. वादळी वाऱ्याच्या या पावसामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळाले. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे तसेच अवकाळी पावसाने साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरींमुळे हवेत आणखीनच गारवा पसरला असून, शहरातील तापमानाचा पारा २५ अंशापर्यंत खालावल्याची नोंद हवामान खात्याने केली. पाऊस पडल्याने थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या हवेतील गारव्याने नवी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला.