शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उन्हामुळे जनसायकल योजनेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:32 IST

नागरिकांची संख्या घटली; जून महिन्यापासून स्टँडची संख्या वाढणार

नवी मुंबई : शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायाम देखील व्हावा यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. पालिकेच्या या प्रणालीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. वाढलेल्या उन्हामुळे आणि सुट्यांमुळे या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद काही प्रमाणावर कमी झाला आहे. परंतु नागरिकांची मागणी पाहता जून महिन्यापासून शहरातील विविध भागात सायकल स्टँडची संख्या वाढविण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहर पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारख्या प्रदूषणमुक्त पर्यायाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. शहरातील नागरिकांनी देखील या योजनेला पसंती दिली आहे.

पहिल्या टप्प्यात नेरु ळ आणि सीवूड येथील विविध सात ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या सायकल स्टँडची संख्या सानपाडा वाशीपर्यंत गेली असून स्टँडची संख्या ४५च्या पुढे गेली आहे. या सायकलींचा वापर प्रामुख्याने व्यायाम करण्यासाठी केला जात असून सकाळच्या वेळी स्टँडवर असलेल्या सायकली अपुऱ्या पडत होत्या. दररोज या सायकलींचा वापर साधारण एक हजाराहून अधिक नागरिक करीत असून शहरातील विविध भागात सायकल स्टँड आणि सायकल उपलब्ध करून देण्याची मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सायकल स्टँडची संख्या ४५ पर्यंत नेण्यात आली असून सुमारे ४५0 हून अधिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाच्या झळा आणि सुट्यांमुळे सायकली वापरणाºया नागरिकांच्या संख्येत सुमारे १0 ते १२ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च महिन्यात सुमारे ५२ हजार राइड्स पूर्ण झाल्या होत्या.

एप्रिल महिन्यात या राइड्सची संख्या ४७ हजारांवर आली असून मे महिन्यात त्यापेक्षा देखील कमी राइड्स झाल्या आहेत. जनसायकल योजनेला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि मागणी यामुळे जून महिन्यापासून सायकल आणि स्टँडची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.