शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

निकालाचा तिढा अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:24 IST

शैक्षणिक वर्षाची सुरु वात होऊन दोन महिने उलटून देखील विद्यापीठाच्या विविध शाखांचे निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे.

प्राची सोनवणे ।नवी मुंबई : शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने उलटून देखील विद्यापीठाच्या विविध शाखांचे निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे. विलंबामुळे विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नवी मुंबईतील अभियांत्रिकी, विधि, पदवी, औषधनिर्माणशास्त्र आदी शाखांमधील विद्यार्थी आणि पालकांनी विद्यापीठाच्या निकाल पद्धतीबाबत असंतोष व्यक्त केला आहे.निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांना परदेशात तसेच इतर राज्यात असलेल्या शिक्षण संधींना मुकावे लागत असल्याने याची नुकसानभरपाई विद्यापीठाकडून मिळेल का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली असून विद्यापीठाचा हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.विधि शाखेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील ५ वेळा तारखा पुढे ढकलल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लवकर निकाल लागला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आॅनलाइन पेपर तपासणीमुळे झालेल्या निकालाच्या गोंधळाने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. तपासणी पद्धतीमधील त्रुटींचा परिणाम निकालावर झाल्यास विद्यार्थ्यांच्या करिअररवर त्याचा वाईट परिणाम होईल. अशा वेळेस मोफत पुनर्मूल्यांकन केले जावे अशीही मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.औषधनिर्माणशास्त्राच्या शेवटच्या वर्षातील निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. नायपरसारख्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील अनेक अडचणी आल्या आहेत. ही आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली आहे.- डॉ. विलासराव कदम, प्राचार्य,भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी