शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निकालाचा तिढा अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:24 IST

शैक्षणिक वर्षाची सुरु वात होऊन दोन महिने उलटून देखील विद्यापीठाच्या विविध शाखांचे निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे.

प्राची सोनवणे ।नवी मुंबई : शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने उलटून देखील विद्यापीठाच्या विविध शाखांचे निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे. विलंबामुळे विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नवी मुंबईतील अभियांत्रिकी, विधि, पदवी, औषधनिर्माणशास्त्र आदी शाखांमधील विद्यार्थी आणि पालकांनी विद्यापीठाच्या निकाल पद्धतीबाबत असंतोष व्यक्त केला आहे.निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांना परदेशात तसेच इतर राज्यात असलेल्या शिक्षण संधींना मुकावे लागत असल्याने याची नुकसानभरपाई विद्यापीठाकडून मिळेल का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली असून विद्यापीठाचा हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.विधि शाखेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील ५ वेळा तारखा पुढे ढकलल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लवकर निकाल लागला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आॅनलाइन पेपर तपासणीमुळे झालेल्या निकालाच्या गोंधळाने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. तपासणी पद्धतीमधील त्रुटींचा परिणाम निकालावर झाल्यास विद्यार्थ्यांच्या करिअररवर त्याचा वाईट परिणाम होईल. अशा वेळेस मोफत पुनर्मूल्यांकन केले जावे अशीही मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.औषधनिर्माणशास्त्राच्या शेवटच्या वर्षातील निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. नायपरसारख्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील अनेक अडचणी आल्या आहेत. ही आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली आहे.- डॉ. विलासराव कदम, प्राचार्य,भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी