शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

निकालाचा तिढा अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:24 IST

शैक्षणिक वर्षाची सुरु वात होऊन दोन महिने उलटून देखील विद्यापीठाच्या विविध शाखांचे निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे.

प्राची सोनवणे ।नवी मुंबई : शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने उलटून देखील विद्यापीठाच्या विविध शाखांचे निकाल अजूनही प्रतीक्षेत आहे. विलंबामुळे विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नवी मुंबईतील अभियांत्रिकी, विधि, पदवी, औषधनिर्माणशास्त्र आदी शाखांमधील विद्यार्थी आणि पालकांनी विद्यापीठाच्या निकाल पद्धतीबाबत असंतोष व्यक्त केला आहे.निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांना परदेशात तसेच इतर राज्यात असलेल्या शिक्षण संधींना मुकावे लागत असल्याने याची नुकसानभरपाई विद्यापीठाकडून मिळेल का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली असून विद्यापीठाचा हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.विधि शाखेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील ५ वेळा तारखा पुढे ढकलल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लवकर निकाल लागला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आॅनलाइन पेपर तपासणीमुळे झालेल्या निकालाच्या गोंधळाने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. तपासणी पद्धतीमधील त्रुटींचा परिणाम निकालावर झाल्यास विद्यार्थ्यांच्या करिअररवर त्याचा वाईट परिणाम होईल. अशा वेळेस मोफत पुनर्मूल्यांकन केले जावे अशीही मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.औषधनिर्माणशास्त्राच्या शेवटच्या वर्षातील निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. नायपरसारख्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील अनेक अडचणी आल्या आहेत. ही आॅनलाइन पेपर तपासणी पद्धत फोल ठरली आहे.- डॉ. विलासराव कदम, प्राचार्य,भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी