शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची जबाबदारी प्रत्येकाची - गणेश नाईक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:34 IST

  घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणारी चित्रभारती चित्रकला स्पर्धा आता एक ब्रॅण्ड बनला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मतेचे विचार रुजविले जात आहेत.

नवी मुंबई  -  घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणारी चित्रभारती चित्रकला स्पर्धा आता एक ब्रॅण्ड बनला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मतेचे विचार रुजविले जात आहेत. मागील १२ वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. भविष्यात महाविद्यालयीत स्तरावर या स्पर्धा घेण्याची योजना आहे. असे असले तरी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन लोकनेते गणेश नाईक यांनी केले.जीवनधारा आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रभारती चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २५ जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख प्रमुख आतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ‘लोकमत’चे सह उपाध्यक्ष विजय शुक्ला, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, माजी महापौर सागर नाईक, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार आदी उपस्थित होते.सध्या देशातील सामाजिक वातावरणात काहीसा नकारात्मक बदल होताना दिसत आहे. राष्ट्राच्या एकसंघतेला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. एकसंघ राष्ट्र हा आपल्या राज्यघटनेचा पाय आहे. हा पाया अभेद्य राहण्यासाठी बंधुभाव जोपासला गेला पाहिजे. जात, धर्म, प्रांत व भाषा या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजविणे, हाच चित्रभारती चित्रकला स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. मागील १२ वर्षांतील या उपक्रमाच्या यशाचा उंचावणारा आलेख पाहता आता त्याचा महाविद्यलयीन स्तरावरसुद्धा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच पुढील वर्षापासून ही स्पर्धात महाविद्यालयीन स्तरावरही घेतली जाईल, अशी घोषणा नाईक यांनी या वेळी आपल्या भाषणातून केले. ‘लोकमत’ हे देशातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ठरले आहे. चित्रभारती चित्रकला स्पर्धेच्या आयोजनात ‘लोकमत’चा बरोबरीचा सहभाग राहिला आहे. यापुढेसुद्धा ही परंपरा कायम राहील, असा विश्वास नाईक यांनी या वेळी व्यक्त केला.चित्रभारती स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील १२० शाळांतील तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शहराच्या दृष्टीने ही अत्यंत गौरवशाली बाब असल्याचे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी केले. चित्रभारती चित्रकला स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ. संजीव नाईक यांनी प्रास्ताविकातून गेल्या १२ वर्षांतील या उपक्रमाचा आढावा घेतला. प्रत्येक वर्षात स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद हे या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक गावडे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक राजू शिंदे, रवींद्र इथापे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले.स्पर्धेतील विजेतेया मोहिमेत तरुणाईला सहभागी करुन घेण्यासाठी पुढील वर्षापासून कॉलेजस्तरावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे.अ गट(इयत्ता ५ वी ते ७ वी)प्रथम क्रमांक : साहिल जाधव (पुणे विद्याभवन स्कूल, नेरूळ)द्वितीय क्रमांक : धिरेंद्र ठाकूर (सेंट आॅगस्टीन, नेरूळ)तृतीय क्रमांक : रविन सराफ (फादर अ‍ॅग्नेल, वाशी)उत्तजनार्थ : शेख आर.ए. गफार (अंजूमन स्कूल, तुर्भे), जिन्मय एस. आम्ब्रे (भारती विद्यापीठ, बेलापूर), गौरव जाधव (भारती विद्यापीठ, बेलापूर, मिलत एस. नाईकवाडी (एम.जी.एम.स्कूल, नेरूळ) आणि सुमित जे. सापने (चार्टेरेड इंग्लिश स्कूल, ऐरोली)ब गट(इयत्ता ८ वी ते १0 वी)प्रथम क्रमांक : विक्रांत धनावडे (आर.एफ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे)द्वितीय क्रमांक : अपर्णा कुंभार (श्रीराम स्कूल, ऐरोली)तृतीय क्रमांक : बाबू आर. आरेथीया (एस.एस.हायस्कूल, नेरूळ)उत्तजनार्थ : ओमकार आहिरे (सेंट मेरी स्कूल, वाशी), झैनाब शेख (मॉडर्न स्कूल, वाशी), भक्ती कदम (शिरवणे विद्यालय), अनिकेत सावे (ज्ञानपुष्प विद्या निकेतन, सीबीडी)विविध रंग एकात्मता के संग सांस्कृतिक कार्यक्रमचित्रभारती चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यानिमित, ‘विविध रंग एकात्मता के संग’ या सांस्कृतिक मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील १२ शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्यांचे सादरीकरण केले. लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.स्पर्धेत १२0 शाळांतील तब्बल २0 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे सतीश माने आणि कला शिक्षक नरेश लोहार यांनी परीक्षण केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई