शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कासाडी नदीतील रसायनाच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास; तळोजा, कळंबोली, कामोठेतील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 23:18 IST

नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

कळंबोली : तळोजा एमआयडीसीतून कासाडी नदी वाहत कामोठे खाडीला मिळते. या नदीत कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरात मोठ्या प्रमाणात उग्र वास पसरतो आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

पनवेलपासून जवळ तळोजा एमआयडीसी आहे. ही औद्योगिक वसाहत ९०७ हेक्टरवर विस्तारित झाली आहे. या परिसरात ९०० कारखाने आहेत. यात ४०० कारखाने रासायनिक आहेत. या कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी एमआयडीसीजवळून वाहणाऱ्या कासाडी नदीत सोडण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे नदी दूषित होत आहे.

कोरोनाच्या काळात कारखाने बंद असल्यामुळे पनवेल परिसरातील नद्या स्वच्छ झाल्या होत्या, परंतु अनलॉकमध्ये कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. स्वच्छ झालेली कासाडी नदी पुन्हा प्रदूषित होऊ लागली आहे. यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे परिसरातील रहिवाशांना कासाडी नदीतील दुर्गंधीमुळे श्वसनाचे त्रास सहन करावे लागत आहेत. प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नागरिकांकडून वारंवार तक्रार करण्यात येते, पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यानुसार, एमआयडीसीतील कारखानदारांना १५ कोटींचा दंड ठोठावला. ती रक्कम वसूलही करण्यात आली. कित्येक वेळा कारखानदारांची पाणीकपातही करण्यात आली होती. तरीदेखील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नदी संवर्धन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात केलेल्या दाव्यामुळे तळोजा कारखानदारांनी दंडात्मक १५ कोटींची रक्कम जमा केली आहे. या रकमेतून कासाडी नदीचे संवर्धन करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल; त्याचबरोबर खाडीकिनारी खारफुटीचेही नुकसान होणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई