शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कासाडी नदीतील रसायनाच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास; तळोजा, कळंबोली, कामोठेतील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 23:18 IST

नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

कळंबोली : तळोजा एमआयडीसीतून कासाडी नदी वाहत कामोठे खाडीला मिळते. या नदीत कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरात मोठ्या प्रमाणात उग्र वास पसरतो आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

पनवेलपासून जवळ तळोजा एमआयडीसी आहे. ही औद्योगिक वसाहत ९०७ हेक्टरवर विस्तारित झाली आहे. या परिसरात ९०० कारखाने आहेत. यात ४०० कारखाने रासायनिक आहेत. या कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी एमआयडीसीजवळून वाहणाऱ्या कासाडी नदीत सोडण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे नदी दूषित होत आहे.

कोरोनाच्या काळात कारखाने बंद असल्यामुळे पनवेल परिसरातील नद्या स्वच्छ झाल्या होत्या, परंतु अनलॉकमध्ये कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. स्वच्छ झालेली कासाडी नदी पुन्हा प्रदूषित होऊ लागली आहे. यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे परिसरातील रहिवाशांना कासाडी नदीतील दुर्गंधीमुळे श्वसनाचे त्रास सहन करावे लागत आहेत. प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नागरिकांकडून वारंवार तक्रार करण्यात येते, पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यानुसार, एमआयडीसीतील कारखानदारांना १५ कोटींचा दंड ठोठावला. ती रक्कम वसूलही करण्यात आली. कित्येक वेळा कारखानदारांची पाणीकपातही करण्यात आली होती. तरीदेखील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नदी संवर्धन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात केलेल्या दाव्यामुळे तळोजा कारखानदारांनी दंडात्मक १५ कोटींची रक्कम जमा केली आहे. या रकमेतून कासाडी नदीचे संवर्धन करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल; त्याचबरोबर खाडीकिनारी खारफुटीचेही नुकसान होणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई