शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

धोकादायक इमारतीतील रहिवाशांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:26 IST

नेते, विकासकाच्या कात्रीत पुनर्बांधणीला खोडा

नवी मुंबई : सिडकोनिर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात सिडकोकडे बोट दाखविल्याने मागील तीन दशकांपासून जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुनर्बांधणीच्या रखडलेल्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ‘दिल से नवी मुंबई’ हे आॅनलाइन व्यासपीठ स्थापन केले आहे. या माध्यमातून मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सद्य:स्थितीचा संपूर्ण तपशील गोळा करून पुढील कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार बी. एन. कुमार यांनी व्यक्त केला आहे.शहराची निर्मित्ती करताना सिडकोने नवी मुंबईच्या विविध भागांत निवासी इमारती बांधल्या. परंतु या इमारतींची अल्पावधीतच पडझड सुरू झाली. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर अवघ्या १० वर्षांत या इमारती राहण्यास योग्य नसल्याचा निर्वाळा आयआयटीसारख्या संस्थेने दिला होता. तेव्हापासून या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न चर्चेत आहे. याच प्रश्नावर अनेक निवडणुका लढल्या गेल्या. मात्र ३५ वर्षांनंतरसुद्धा हा प्रश्न जैसे थेच राहिला आहे. राज्य सरकारने या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआयची घोषणाही केली आहे. मात्र त्याची अधिसूचना निघाली नाही. त्यामुळे रहिवासी संभ्रमात आहेत. दुसरीकडे पुनर्बांधणीसाठीचे अनेक प्रस्ताव परवानगीसाठी सिडकोकडे पडून आहेत. तर महापालिकेकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. मात्र नगरविकास विभागाने इमारतीच्या पुनर्बांधणीचा चेंडू सिडकोच्या कोर्टात ढकलत अप्रत्यक्षरीत्या जबाबदारी झटकून टाकली आहे. सिडकोकडूनसुद्धा याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुमार यांनी आक्रमक पवित्रा घेत या मुद्द्यावर कायदेशीर संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी ‘दिल से नवी मुंबई’ हे आॅनलाइन व्यासपीठ स्थापन केले असून, सिडकोनिर्मित्त इमारतींचा सुरुवातीपासूनचा तपशील त्यावर अपलोड करण्याचे आवाहन रहिवाशांना केले आहे.इमारतीच्या उभारणीपासून आतापर्यंतच्या स्थितीबाबत रहिवाशांना १५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. सिडको व नगरविकास विभागाकडे आरटीआईच्या माध्यमातून या प्रश्नांना उत्तरे मागितली जाणार असल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.तांत्रिक अडचणीधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतीच्या भूखंडाची मालकी आजही सिडकोच्या नावे आहे. महापालिकेच्या माध्यमातून पाठविल्या जाणाºया मालमत्ता कराच्या देयकावर याचा आजही स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो. सिडकोने येथील जमिनी ६0 वर्षांच्या भोडकरारावर दिल्या आहेत. त्यामुळे पुनर्बांधणीत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.