शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

नवी मुंबईत सिडकोच्या भूखंडांचे राखीव दर जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:34 IST

संचालक मंडळाचा निर्णय: बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नोड व नोडच्या बाहेरील क्षेत्रात असलेल्या आपल्या भूखंडांच्या राखीव किमतीत वाढ न करता, ते जैसे थे ठेवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजेच १ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीसाठी हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा बांधकाम क्षेत्राला होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून दरवर्षी येथील भूखंडांचे राखीव दर जाहीर केले जातात. या दरात दरवर्षी ५ ते १५ टक्के इतकी वाढ दर्शविली जाते. या राखीव दराच्या आधारेच संबंधित विभागातील जमिनीची किमत निश्चित केली जाते. ही प्रक्रिया मागील अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू असल्याने नवी मुंबईतील भूखंडांचे दर गगनाला भिडले आहेत. पर्यायाने घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत, परंतु अगोदरच मंदीचा फटका बसलेल्या रियल इस्टेट क्षेत्राला कोरोना संसर्गाने पूर्णत: ढवळून काढले आहे. या काळात सुरू असलेले अनेक बांधकाम प्रकल्प ठप्प पडले, तर सध्याच्या परिस्थितीत नवीन बांधकाम सुरू करण्यास कोणीही विकासक धजावताना दिसत नाही. त्यामुळे बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची परवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर मरगळलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी सिडकोने चालू आर्थिक वर्षात भूखंडांच्या राखीव दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षाकचे दर कायम ठेवले. 

विकासकांना फायदा चालू आर्थिक वर्षात म्हणजेच१ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत भूखंडांच्या राखीव दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भूखंडांचे दर स्थीर राहण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा विकासकांना होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई