शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

नवी मुंबई, उरणमधील पाच पाणथळ जागा आरक्षित करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 01:44 IST

वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे आदेश : सिडको अधिकारी, ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मधुकर ठाकूरउरण : तालुक्यातील पाणजे-डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल, एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत सलेल्या पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलने दिले आहेत.

नवी मुंबई, उरणमध्ये असलेल्या पाणथळी आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेली कांदळवन लुप्त झाली आहेत. त्याशिवाय कांदळवन, पाणथळी आणि दळी जागा उच्च जैविकता आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. पर्यावरण आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पाणथळ आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत.बॉम्बे नॅशनल हिस्ट्री आॅफ सोसायटी या निसर्ग संस्थेच्या अहवालानुसार कांदळवन, पाणथळी, दळी जागा नष्ट झाल्याने नवी मुंबई व उरण परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, पर्यावरणाचा ºहास होत आहे.

उच्च जैवविविधतेचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पक्ष्यांच्या वाढीसाठी पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली असल्याचा अभिप्रायही नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी काही संस्थांनी न्यायालयातही दाद मागितली आहे.कांदळवनांच्या संवर्धनाची आवश्यकताया पार्श्वभूमीवर नवी मुंबई, उरण परिसरात अत्यंत महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाणथळ, दळी जागा शिल्लक आहेत. यामध्ये उरण तालुक्यातील पाणजे-डोंगरी येथील पश्चिम भाग, बेलपाडा गावाकडील उत्तर-पश्चिम भाग, भेंडखळ गाव हद्दीतील दक्षिण भाग तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल परिसरातील भाग, सीवूड परिसरातील एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी पाणथळी दळी जागा उपलब्ध आहेत. दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या या पाचही पाणथळी, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण, सरंक्षण, संवर्धन जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे अ‍ॅडिशन व प्रिन्सिपल चिफ कॉन्झरवेटर विरेंद्र तिवारी यांनी दिले आहेत.