शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, उरणमधील पाच पाणथळ जागा आरक्षित करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 01:44 IST

वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे आदेश : सिडको अधिकारी, ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मधुकर ठाकूरउरण : तालुक्यातील पाणजे-डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल, एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत सलेल्या पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलने दिले आहेत.

नवी मुंबई, उरणमध्ये असलेल्या पाणथळी आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेली कांदळवन लुप्त झाली आहेत. त्याशिवाय कांदळवन, पाणथळी आणि दळी जागा उच्च जैविकता आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. पर्यावरण आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पाणथळ आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत.बॉम्बे नॅशनल हिस्ट्री आॅफ सोसायटी या निसर्ग संस्थेच्या अहवालानुसार कांदळवन, पाणथळी, दळी जागा नष्ट झाल्याने नवी मुंबई व उरण परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, पर्यावरणाचा ºहास होत आहे.

उच्च जैवविविधतेचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पक्ष्यांच्या वाढीसाठी पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली असल्याचा अभिप्रायही नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी काही संस्थांनी न्यायालयातही दाद मागितली आहे.कांदळवनांच्या संवर्धनाची आवश्यकताया पार्श्वभूमीवर नवी मुंबई, उरण परिसरात अत्यंत महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाणथळ, दळी जागा शिल्लक आहेत. यामध्ये उरण तालुक्यातील पाणजे-डोंगरी येथील पश्चिम भाग, बेलपाडा गावाकडील उत्तर-पश्चिम भाग, भेंडखळ गाव हद्दीतील दक्षिण भाग तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल परिसरातील भाग, सीवूड परिसरातील एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी पाणथळी दळी जागा उपलब्ध आहेत. दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या या पाचही पाणथळी, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण, सरंक्षण, संवर्धन जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे अ‍ॅडिशन व प्रिन्सिपल चिफ कॉन्झरवेटर विरेंद्र तिवारी यांनी दिले आहेत.