शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

‘आरक्षण’आदिवासींचा मोर्चा

By admin | Updated: December 11, 2015 01:22 IST

आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे.

अलिबाग : आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे. तो डाव महाराष्ट्रातील तमाम आदिवासी समाजातील जनतेने उधळून लावावा, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या रायगडचे अध्यक्ष महादेव दिवेकर यांनी केले आहे. सरकारने आदिवासी संशोधन कार्यालयाला दिलेले काम परत घेण्यास सांगावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील आदिवासी समाज गुरु वारी मोठ्या संख्येने अलिबागला दाखल झाला होता. मोर्चा काढून त्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. आदिवासी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले.महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील ४५ जमातीपैकी १७ जमाती या खऱ्या आदिवासी आहेत की नाही, याचे संशोधन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये प्रामुख्याने ढोर कोळी, भिल्ल तडवी, टोकरे कोळी, कोळी मल्हार, परधान, मन्नेर वारळू, कोकणा, कोकणी, महादेव कोळी, माना, ठाकूर (क), ठाकूर (म), गोंड गोवारी आदी जमातींचा समावेश आहे. केंद्र सरकाराच्या मान्यतेने आदिवासी संशोधन कार्यालयाला हे काम दिले आहे. यासाठी केंद्र सरकारने एक कोटी रुपये मंजूर केले असून पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला दिले असल्याचा दावा दिवेकर यांनी केला. आदिवासी समाजाच्या जमिनी कोणीही खरेदी करु नये म्हणून कायदा करण्यात आला आहे. या जमाती आदिवासीमधून वगळल्या तर, विकास कधीच होणार नाही. पुन्हा अंधारात जावे लागेल. म्हणून हा प्रश्न केवळ संशोधनाचा नाही, तर व्यक्तिमत्व विकास रोखण्याचा आहे. आदिवासी समाजाचा विकास रोखून त्यांना दुबळे करण्याचा सरकारचा डाव वेळीच उधळून लावून सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणाचा निषेध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी समाज उपस्थित होता. (प्रतिनिधी)