शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘आरक्षण’आदिवासींचा मोर्चा

By admin | Updated: December 11, 2015 01:22 IST

आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे.

अलिबाग : आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे. तो डाव महाराष्ट्रातील तमाम आदिवासी समाजातील जनतेने उधळून लावावा, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या रायगडचे अध्यक्ष महादेव दिवेकर यांनी केले आहे. सरकारने आदिवासी संशोधन कार्यालयाला दिलेले काम परत घेण्यास सांगावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील आदिवासी समाज गुरु वारी मोठ्या संख्येने अलिबागला दाखल झाला होता. मोर्चा काढून त्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. आदिवासी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले.महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील ४५ जमातीपैकी १७ जमाती या खऱ्या आदिवासी आहेत की नाही, याचे संशोधन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये प्रामुख्याने ढोर कोळी, भिल्ल तडवी, टोकरे कोळी, कोळी मल्हार, परधान, मन्नेर वारळू, कोकणा, कोकणी, महादेव कोळी, माना, ठाकूर (क), ठाकूर (म), गोंड गोवारी आदी जमातींचा समावेश आहे. केंद्र सरकाराच्या मान्यतेने आदिवासी संशोधन कार्यालयाला हे काम दिले आहे. यासाठी केंद्र सरकारने एक कोटी रुपये मंजूर केले असून पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला दिले असल्याचा दावा दिवेकर यांनी केला. आदिवासी समाजाच्या जमिनी कोणीही खरेदी करु नये म्हणून कायदा करण्यात आला आहे. या जमाती आदिवासीमधून वगळल्या तर, विकास कधीच होणार नाही. पुन्हा अंधारात जावे लागेल. म्हणून हा प्रश्न केवळ संशोधनाचा नाही, तर व्यक्तिमत्व विकास रोखण्याचा आहे. आदिवासी समाजाचा विकास रोखून त्यांना दुबळे करण्याचा सरकारचा डाव वेळीच उधळून लावून सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणाचा निषेध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी समाज उपस्थित होता. (प्रतिनिधी)