शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

काठमांडूत अडकलेल्या कामोठे येथील पर्यटकांची सुटका; देवेंद्र फडणविस यांची यशस्वी मध्यस्ती 

By वैभव गायकर | Updated: December 29, 2023 20:32 IST

तुमचे पैसे आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही तुम्हाला सोडणार नसल्याचे सांगत.या प्रवाशांना एका रूम मध्ये डांबुन ठेवण्यात आले.

पनवेल: पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील 58 भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी दि.16 रोजी गेले होते.गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले.यावेळी लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर दि.23 रोजी काठमांडू याठिकाणी या पर्यटकांना त्याठिकाणच्या ट्रॅव्हल्स एजन्सीकडून सुरुवात झाली. तुमचे पैसे आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही तुम्हाला सोडणार नसल्याचे सांगत.या प्रवाशांना एका रूम मध्ये डांबुन ठेवण्यात आले.

या 58 प्रवाशांमध्ये 35 महिला आणि 23 पुरुषांचा समावेश होता.या पर्यटकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते तरी देखील या पर्यटकांना डांबुन ठेवण्यात आले. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही असे  काठमांडू येथील ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी या पर्यटकांना धमकावयला सुरूवात केली.या दरम्यान करायचा काय ? असा प्रश्न या पर्यटकांना भेडसावयाला लागला.या पर्यटकांपैकी संजय म्हात्रे म्हात्रे यांनी त्यांचे मुंबईतील मित्र अतुल भाटिया यांना फोन करून यासंदर्भात मदत मागितली.त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपर्क क्रमांक देऊन त्या क्रमांकावर दाद मागण्याचा सल्ला म्हात्रे यांना दिला.

संजय म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद म्हात्रे यांना आला. त्यांनी माहिती घेतली.  फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळच्या संबंधित प्राधिकरणाला हि बाब कळवली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना  घडलेला प्रसंग सांगितला. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले.

देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले.त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करू दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण दि.28 रोजी सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. कामोठ्या मधील यात्री प्रवास यांच्या मार्फत या पर्यटकांनी बुकिंग केली होती.मात्र काठमांडू येथील राधाकृष्ण टूर्स ट्रॅव्हल्सच्या मार्फत आम्हाला खूप मानसिक त्रास दिल्याचा आरोप संजय म्हात्रे यांनी केला.

कामोठ्यातील ग्रामस्थही आले धावुन -हा प्रकार घडल्यावर ग्रामस्थांसमोर मोठा पेच निर्माण झाला.पुढे करायचे काय ? असा प्रश्न या पर्यटकांना पडला.यावेळी गावातील काही मंडळी मदतीला धावली.संभाजी चिपळेकर,भालचंद्र म्हात्रे,अरुण म्हात्रे,रवींद्र जोशी यांनी या पर्यटकांना तत्काळ आर्थिक मदत ऑनलाईन स्वरूपात पाठवली.या ग्रामस्थांचे देखील आम्ही आभारी असल्याचे या पर्यटकांपैकी एक असलेले नारायण नाईक यांनी सांगितले.

आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारी आहोत.त्यांच्यामुळे आम्ही सर्वजण सुखरूप आमच्या मुलाबाळासह घरी पोहचलो.आम्ही पुर्ण पैसे दिले असताना देखील आम्हाला मानसिक त्रास देणाऱ्या राधाकृष्ण टूर्स अँड ट्रॅव्हर्सवर कारवाई झाली पाहिजे.- संजय म्हात्रे (काठमांडू येथे अडकलेला पर्यटक ,कामोठे)

टॅग्स :JapanजपानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस