शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

स्मार्ट सिटीसाठी नागरी सहभाग आवश्यक

By admin | Updated: January 8, 2016 02:17 IST

शहर स्मार्ट बनविण्यासाठी राज्यकर्ते, शासन, प्रशासन आणि शहरवासीयांचा सहभाग मोलाचा ठरतो. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादातूनच

नवी मुंबई : शहर स्मार्ट बनविण्यासाठी राज्यकर्ते, शासन, प्रशासन आणि शहरवासीयांचा सहभाग मोलाचा ठरतो. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादातूनच शहर स्मार्ट बनते,असे मत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेसक्लब आणि नवी मुंबई युनियन आॅफ जर्नालिस्ट यांच्या पुढाकाराने आयोजित स्मार्ट सिटी नवी मुंबई:संकल्पना आणि अपेक्षा या परिसंवादात ते बोलत होते. मनातील स्वार्थ, संकुचितपणा, अहंकार दूर ठेवल्यास शहरेच काय देशही स्मार्ट होईल, असा आशावाद महापौरांनी व्यक्त केला. या परिसंवादास प्रमुख वक्ते म्हणून महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर, नगररचना सल्लागार सुहास गोखले, केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालय समिती सदस्य हितेन सेठी, माहिती-जनसंपर्क महासंचालनालयचे संचालक देवेंद्र भुजबळ, बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी उपस्थित होते. शासकीय यंत्रणांनी राबवलेल्या मोहिमांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास नवी मुंबई शहर स्मार्ट बनेल, असा विश्वास मोहन डगांवकर यांनी यावेळी व्यक्त केला.तर आपत्तीच्या प्रसंगी पोलीस, अग्निशमन दल, खाजगी स्वयंसेवी संस्थांची मदत जिथे तत्परतेने पोहचू शकते ते शहर स्मार्ट म्हणायला हरकत नाही, असे मत प्रसिध्द वास्तुविशारद हितेन सेठी यांनी मांडले. यावेळी अर्बन प्लॅनिंगचे कन्सल्टन्ट सुहास गोखले, बांधकाम व्यावसायिक देवांग त्रिवेदी व माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनीही स्मार्ट सिटीविषयी आपली मते मांडली. परिसंवादाच्या प्रारंभी नवी मुंबई युनियन आॅफ जर्नालिस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी दोन्ही संघटनांच्या माध्यमातून वर्षभर आयोजित उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली. तर नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी सूत्रसंचालन केले. निवडक श्रोत्यांकडून त्यांनी स्मार्ट सिटीबाबतची मते जाणून घेतली. (प्रतिनिधी)