शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुलांच्या दुरुस्तीचा वाहतुकीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:39 IST

ठिकठिकाणी वाहतूककोंडी; वाहनचालकांची कसरत

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर दोन ठिकाणी सुरू असलेल्या पुलांच्या दुरुस्तीकामाचा फटका वाहतुकीला बसत आहे. परिणामी, रहदारीच्या वेळेस वाहतूककोंडी वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलिसांवरील ताणही वाढत चालला आहे. अशातच ठाणे बेलापूर मार्गावरही रबाळे येथे रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक वळवण्यात आल्यानेही नोडअंतर्गतच्या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे.सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडीपूल व सानपाडा पूल येथील एका लेनचे काम हाती घेण्यात आले आहे. वाशी खाडीपुलावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तर सानपाडा पुलावर पनवेलकडे जाणाºया लेनवर ही कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी सातत्याने खड्डे पडून होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात आहे. त्याकरिता एकच लेन सुरू ठेवण्यात आलेली आहे. मात्र, मुंबई-पुणे मार्गावरील सायन-पनवेल हा महत्त्वाचा मार्ग असल्याने त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी त्यात अधिकच भर पडलेली असते. त्यामुळे दोन्ही पुलांच्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यात रुग्णवाहिकांसह इतर अत्यावश्यक सुविधांचीही वाहने अडकून पडत आहेत. तर सानपाडा येथील पुलावरील कामाला पर्याय म्हणून पुलाखालील रस्त्याने वाहने वळवली जात आहेत. तर पुलावरून एका लेनमध्येच वाहने सोडण्यात येत आहेत. याचा परिणाम सानपाडा पुलाखालील जंक्शनवरील वाहतुकीवर होत आहे. सदर एपीएमसी मार्केटला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने अगोदरच त्या ठिकाणी सतत वाहतूककोंडी असते.अशातच पुलावरील निम्मी वाहतूक पुलाखालून वळवली जात असल्याने तिथल्या कोंडीत अधिकच वाढ होताना दिसत आहे. यामुळे वाहनचालकांच्या पुढे जाण्याच्या घाईत त्यांच्यात वादही उद्भवत आहेत. यामुळे वाशी ते तुर्भे दरम्यानच्या सर्व जंक्शन व वाहतूककोंडी होणाºया ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. अशातच सानपाडा पुलाखालील खासगी ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे वाहतूककोंडीत अधिकच भर टाकत आहेत. यानंतरही कारवाईत होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने नोड अंतर्गतच्या रस्त्यांवरही वाहतूककोंडी वाढत चालली आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असलेल्या या दुरुस्तीकामांमुळे शहराच्या दोन्ही टोकाच्या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. याचा त्रास वाहनचालकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे.अंतर्गत वाहतूक विस्कळीतठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे ऐरोलीत प्रवेशाच्या मार्गावर रस्त्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. याकरिता तिथली वाहतूक वळवण्यात आली आहे. परिणामी, ऐरोली मार्गे मुलुंडकडे जाणारी छोटी वाहने घणसोली, रबाळे, गोठीवली येथील अंतर्गतच्या मार्गाने जात आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी