शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नवी मुंबईतील मोक्याचे भूखंडही आता गिळंकृत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:14 IST

अडीच चटईक्षेत्र फक्त पीएम आवास योजनेसाठीच : त्या आदेशात सिडको वसाहतींसह गावठाणे उपेक्षितच

नारायण जाधव नवी मुंबई : शासनाच्या नगरविकास विभागाने गेल्या गुरुवारी काढलेला अडीच चटईक्षेत्राचा आदेश हा नवी मुंबईतील धोकादायक झालेल्या सिडकोच्या जुन्या वसाहतींसाठी नव्हे, तर फक्त शहरात बसस्थानके, रेल्वेस्थानके आणि इतर मोकळ्या भूखंडावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधणाऱ्या प्रकल्पांनाच लागू होणार आहे. जाणकारांच्या मतांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडको नवी मुंबईत जी ९० हजार घरे बांधणार आहे, त्या भूखंडांवर विकसित होणाºया प्रकल्पांनाच हे अडीच चटईक्षेत्र मिळणार आहे. यामुळे सिडकोच्या जुन्या वसाहतींसह मूळ गावठाणांतील रहिवाशांची मोठ्या घरांची प्रतीक्षा कायम राहणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सिडकोकडे मोक्याचे भूखंड नसल्यात जमा आहेत. जे काही आहेत ते रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि ट्रक टर्मिनलचे आहेत. त्यातीलच काही भूखंडांवर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेची ९० हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या डीसी रूलमध्ये अडीच चटईक्षेत्राची तरतूद नाही. सिडकोने शहरातील सानपाडा, जुईनगर रेल्वेस्थानके परिसरासह वाशी ट्रक टर्मिनलच्या भूखंडासह इतर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर ही ९० हजार घरे बांधण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

६० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारकज्या विकासकांना किंवा बसस्थानकांसह मेट्रो आणि रेल्वेस्थानकांच्या परिसरातील भूखंडांवर अडीच चटईक्षेत्राचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी त्या प्रकल्पांतील एकूण घरांपैकी 60% घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी बांधणे गरजेचे असून ती त्या गटांसाठीच आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे.

शिवाय, अडीच चटईक्षेत्राचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी चार हजार चौरस मीटरचा एकत्रित भूखंड असावा. तो १८ मीटर रुंदीच्या रस्त्यास हा भूखंड जोडलेला असावा. पुनर्विकास करताना 15% जागा खुली ठेवावी.

नाल्यापासून भूखंडाचे अंतर १५ मीटर लांब असावे, यासह सदर भूखंड रेल्वे/ मेट्रोस्थानकापासून ५०० मीटर आणि बसस्थानकापासून ३०० मीटर लांब असावा, अशा अटी आहेत.

त्या पाहिल्या तर नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर रेल्वेस्थानकांसमोरील भूखंडांसह कळंबोली, पनवेल बसस्थानक, वाशी ट्रक टर्मिनलच्या मोक्याच्या जागा गिळंकृत होणार एवढे मात्र नक्की.