शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले पेयजलचे काम, निधी मंजूर तरी काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:02 IST

खैरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. निधीअभावी हे काम रखडल्याचे बोलले जात आहे. निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी केव्हा बांधून होणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहे.

मयूर तांबडे पनवेल : तालुक्यातील खैरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. निधीअभावी हे काम रखडल्याचे बोलले जात आहे. निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी केव्हा बांधून होणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत तालुक्यातील खैरवाडी येथे विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३-१४ मध्ये सुरू करण्यात आले. ३१ लाख ६२ हजार रु पयांच्या या कामाला सुरु वात झाल्यानंतर १७ लाख ९० हजार रु पयांचा खर्च करण्यात आलेला आहे. यात विहिरीचे काम पूर्ण झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने ही नळपाणी योजना अयशस्वी झाली असल्याचे दिसत आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर विहिरीतून पाण्याच्या टाकीत पाणी सोडायचे आहे व त्यानंतर गावातील नागरिकांच्या घरी पाणी घरोघरी सोडले जाणार आहे. मात्र चार वर्षे उलटून गेली तरी देखील ही योजना पूर्णत्वास आलेली नाही.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे तीनतेरा वाजले असल्यामुळे खैरवाडी ग्रामस्थ नाराज आहेत.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बांधण्यात येणाºया नळपाणी योजनेत विहीर, पंप हाउस, पंपिंग मशिनरी, विहीर ते गाव पाइपलाइनचा समावेश आहे. पी. सी. जाधव या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. ३७ लाख रु पये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले. मात्र ५ वर्षांपासून काम अर्धवट असल्याने नागरिकांना योजनेचा काहीच लाभ झाला नाही.गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही पेयजल योजना अपूर्णावस्थेत आहे. पाण्यावाचून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट कामामुळे ग्रामस्थांमध्ये ठेकेदार व सुस्त प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.>निधी मिळाला तर ताबडतोब हे काम पूर्ण होईल. निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.- आर.डी.चव्हाण,उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, पनवेल