शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

तळोजातील कैद्यांची पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:49 IST

बक्षिसाची रक्कम देणार शहिदांच्या कुटुंबीयांना : रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार निधी

वैभव गायकरपनवेल : राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेत विजेते ठरल्यानंतर तळोजा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी आपल्या पारितोषिकांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. रामचंद्र प्रतिष्ठान मार्फत या स्पर्धेचे आयोजन तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले होते.

मुंबईस्थित रामचंद्र प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन करत असून, यंदा ही स्पर्धा १६ कारागृहांमध्ये आयोजित करण्यात आली. त्यात दोन हजारांहून अधिक महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.तळोजा कारागृहात ७ मे रोजी भरविण्यात आलेल्या स्पर्धेत तब्बल ५० कैदी सहभागी झाले होते. यात तीन जणांची उत्कृष्ट लिखाणाबद्दल निवड करण्यात आली. तर पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आली. यापैकी एका कैद्याने बक्षिसाची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी देऊ केली. त्यानंतर सर्वच विजेत्या स्पर्धकांनी आपल्या बक्षिसाची रक्कम शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर, शिक्षक नामदेव शिंदे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ज्येष्ठ सदस्या, लेखिका अनुराधा खोत, ज्येष्ठ कामगार नेते अण्णासाहेब देसाई, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे सदस्य देवेंद्र गंद्रे तसेच रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे उपस्थित होते.

उपक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे साहाय्य मिळाले आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदिवान स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन आपले विचार मराठी, हिंदी व इंग्रजी निबंधातून व्यक्त केले. त्यांचे परीक्षण डॉ. सुमेधा मराठे यांनी केले असून, निबंधातून व्यक्त झालेले विचार अत्यंत प्रभावी आहेत. बंदिवान कारागृहातून बाहेर आल्यानंतर समाजासाठी चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील कारागृहांत नियमितपणे स्पर्धा राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या संचालिका नयना शिंदे यांनी सांगितले. पारितोषिकाची रक्कम रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्या मार्फत शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पाठविण्यात येईल, असे तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर यांनी सांगितले.