शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तळोजातील कैद्यांची पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:49 IST

बक्षिसाची रक्कम देणार शहिदांच्या कुटुंबीयांना : रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार निधी

वैभव गायकरपनवेल : राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेत विजेते ठरल्यानंतर तळोजा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी आपल्या पारितोषिकांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. रामचंद्र प्रतिष्ठान मार्फत या स्पर्धेचे आयोजन तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले होते.

मुंबईस्थित रामचंद्र प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन करत असून, यंदा ही स्पर्धा १६ कारागृहांमध्ये आयोजित करण्यात आली. त्यात दोन हजारांहून अधिक महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.तळोजा कारागृहात ७ मे रोजी भरविण्यात आलेल्या स्पर्धेत तब्बल ५० कैदी सहभागी झाले होते. यात तीन जणांची उत्कृष्ट लिखाणाबद्दल निवड करण्यात आली. तर पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आली. यापैकी एका कैद्याने बक्षिसाची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी देऊ केली. त्यानंतर सर्वच विजेत्या स्पर्धकांनी आपल्या बक्षिसाची रक्कम शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर, शिक्षक नामदेव शिंदे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ज्येष्ठ सदस्या, लेखिका अनुराधा खोत, ज्येष्ठ कामगार नेते अण्णासाहेब देसाई, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे सदस्य देवेंद्र गंद्रे तसेच रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे उपस्थित होते.

उपक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे साहाय्य मिळाले आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदिवान स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन आपले विचार मराठी, हिंदी व इंग्रजी निबंधातून व्यक्त केले. त्यांचे परीक्षण डॉ. सुमेधा मराठे यांनी केले असून, निबंधातून व्यक्त झालेले विचार अत्यंत प्रभावी आहेत. बंदिवान कारागृहातून बाहेर आल्यानंतर समाजासाठी चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील कारागृहांत नियमितपणे स्पर्धा राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या संचालिका नयना शिंदे यांनी सांगितले. पारितोषिकाची रक्कम रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्या मार्फत शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पाठविण्यात येईल, असे तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुलेकर यांनी सांगितले.