शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

रिलायन्सला मुख्य जलवाहिनीतून पाणी

By admin | Updated: June 22, 2017 00:33 IST

नियमाप्रमाणे मुख्य जलवाहिनीमधून कोणालाही थेट पाणीपुरवठा करता येत नाही; परंतु कोपरखैरणेमध्ये रिलायन्स वसाहत व शाळेसाठी नियमबाह्यपणे नळजोडणी देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नियमाप्रमाणे मुख्य जलवाहिनीमधून कोणालाही थेट पाणीपुरवठा करता येत नाही; परंतु कोपरखैरणेमध्ये रिलायन्स वसाहत व शाळेसाठी नियमबाह्यपणे नळजोडणी देण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. कोपरखैरणेमध्ये दोन दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मोरबे परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना याच परिसरामधील रिलायन्स वसाहत व शाळेसाठी मात्र मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. संबंधितांना मुख्य जलवाहिनीमधून थेट नळजोडणी देण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोणालाही मुख्य जलवाहिनीमधून नळजोडणी दिली जात नसताना रिलायन्सवर वरदहस्त का, असा प्रश्न हांडेपाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी व रिलायन्स वसाहतीला इतर नागरिकांप्रमाणे जलकुंभावरून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनीही हे प्रकरण गंभीर आहे. राजाला वेगळा न्याय व प्रजेला वेगळा न्याय असा प्रकार सुरू आहे. रिलायन्स समूहाला थेट जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यात आला असेल तर तो तत्काळ खंडित करण्यात यावा व सर्वांना समान न्यायाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. शहर अभियंता मोहन डगावकर यांनीही पालिका कोणालाही मुख्य जलवाहिनीमधून नळजोडणी देत नाही. कोपरखैरणेमध्ये तशाप्रकारे जोडणी दिली असेल, तर त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. मोरबे धरण परिसरात महावितरणच्या फिडरमध्ये बिघाड झाला असल्याने विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोपरखैरणे व इतर परिसरामध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.