शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पोलिसांकडून नियम धाब्यावर

By admin | Updated: October 28, 2015 01:08 IST

वाहतूक पोलीस रोडवर वाहने उभी करणाऱ्या दोनशे वाहनधारकांवर रोज कारवाई करीत आहेत. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारत असताना स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत

नामदेव मोरे, नवी मुंबईवाहतूक पोलीस रोडवर वाहने उभी करणाऱ्या दोनशे वाहनधारकांवर रोज कारवाई करीत आहेत. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारत असताना स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत. बेलापूरमधील पोलीस मुख्यालयाबाहेरच रोडवर बिनधास्तपणे वाहने उभी केली जात आहेत. रस्ता अडविणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. सिडकोने नवी मुंबईचे केलेले नियोजन फसले आहे. शहरामध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. शहरातील वाहनांची संख्या ३,५८,६३९ एवढी झाली आहे. दुचाकी वाहनांची संख्या १ लाख ७० हजार ६३३ आणि कारची संख्या १ लाख १४ हजार ६७३ एवढी झाली आहे. व्यावसायिक वाहनांची संख्याही तब्बल ७३ हजार झाली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात वाहनतळ विकसित केलेले नाहीत. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे नाईलाजाने नागरिकांना रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत. परंतु रोडवर उभ्या केलेल्या वाहनांवर तत्काळ वाहतूक पोलीस कारवाई करतात. गतवर्षी नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्याप्रकरणी तब्बल ७३,५८१ वाहनांवर कारवाई केली होती. रोज सरासरी २०० ते २५० वाहनांवर कारवाई केली जात आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई केली जात असताना पोलीस स्वत: मात्र वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. सीबीडीमधील पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर दोन ते तीन लेनमध्ये वाहने उभी केली जात आहेत. कोकण भवनकडून न्यायालयाकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. वाहतूक पोलीस दोन लेनमध्ये वाहने उभी केल्यास सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई करतात. परंतू पोलीस मुख्यालयाबाहेर स्वत: पोलीसच बेशिस्तपणे वाहने उभी करत असताना त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली जात नाही. स्वत: पोलीसच वाहतुकीचे नियम तोडत आहेत. मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर केला जात नाही. बहुतांश सर्व पोलीस स्टेशनच्या बाहेर पदपथावरही वाहने उभी करून ठेवली जात आहेत. कायद्याचे रखवालदारच नियम तोडत असताना त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई केली नाही तर पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. सामान्य नागरिकांनी रोडच्या कडेला वाहन उभे केले की तत्काळ त्यावर कारवाई केली जाते. पदपथावरील वाहनेही उचलली जात आहेत. वाहतुकीस अडथळा नसलेल्या वाहनांवरही कारवाई होते. परंतु दुसरीकडे पोलीस मात्र स्वत:च रोडवर जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत आहेत. कायद्यापेक्षा पोलीस मोठे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून सर्वांना समान न्याय हवा, अशी अपेक्षा केली जात आहे.