शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:25 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बोगस मतदारांची नोंदणी सुरू झाली असून, कांदा मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. या परवान्यांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. प्रत्येक वर्षी जवळपास दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत आहे. प्रचंड आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व व्यापारी प्रतिनिधींमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते. २००८ मध्ये बाजार समितीची निवडणूक झाली होती. डिसेंबर २०१३ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. यानंतर जवळपास एक वर्ष संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली. तेव्हापासून अद्याप प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे.उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुंबई बाजार समितीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याचाच भाग म्हणून ३० नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. २९ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळावर जाण्यासाठी इच्छुक व्यापारी प्रतिनिधींनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. अ वर्ग खरेदीदारांची चौकशी करण्यात यावी व जे प्रत्यक्षात व्यापार करत नाहीत, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.कांदा-बटाटा मार्केटमध्ये २०१७ मध्ये दोन जणांना अ वर्ग खरेदीदार परवान्यांचे वाटप केले होते. २०१८ मध्ये १० जणांनी परवाने घेतले होते. २०१९ मध्ये आतापर्यंत तब्बल २६६ परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यापैकी तब्बल १५४ परवान्यांचे वाटप सप्टेंबरमध्ये झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे परवाने दिले असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी कांदा-बटाटा अडत व्यापारी संघटनेनेही बोगस मतदारांची नोंदणी केली जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याविषयी लेखी पत्रही प्रशासनास दिले होते. मार्केटमधील व्यापारी राजेंद्र शेळके यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.शेवटच्या महिन्यात जे अ वर्ग खरेदीदाराचे परवाने वितरित केले आहेत, त्यामध्ये बोगस खरेदीदारांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. यापैकी अनेक जण परवान्यांसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष मार्केटमध्येही आलेले नाहीत. ज्या कालावधीमध्ये परवान्यांचे वितरण झाले, त्या कालावधीमधील सीसीटीव्ही कॅमेºयाचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे; परंतु प्रशासनाने त्याला नकार दिला आहे.सीसीटीव्ही चित्रणाची मागणीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये अ वर्ग खरेदीदार परवान्यांची खैरात वाटण्यात आली आहे. यामधील अनेकांनी प्रत्यक्षात मार्केटमध्ये येऊन परवान्यांसाठी अर्जही केलेला नाही. इच्छुक उमेदवारांनीही नोंदणी केलेली असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अर्ज दाखल झालेल्या कालावधीमधील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेºयांचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने चित्रीकरण देण्यास मनाई केली आहे.एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. याची चौकशी होऊन बोगस नोंदणी रद्द करण्यात यावी.- राजेंद्र शेळके,व्यापारी, कांदा मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई