शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:25 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बोगस मतदारांची नोंदणी सुरू झाली असून, कांदा मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. या परवान्यांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. प्रत्येक वर्षी जवळपास दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत आहे. प्रचंड आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व व्यापारी प्रतिनिधींमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते. २००८ मध्ये बाजार समितीची निवडणूक झाली होती. डिसेंबर २०१३ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. यानंतर जवळपास एक वर्ष संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली. तेव्हापासून अद्याप प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे.उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुंबई बाजार समितीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याचाच भाग म्हणून ३० नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. २९ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळावर जाण्यासाठी इच्छुक व्यापारी प्रतिनिधींनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. अ वर्ग खरेदीदारांची चौकशी करण्यात यावी व जे प्रत्यक्षात व्यापार करत नाहीत, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.कांदा-बटाटा मार्केटमध्ये २०१७ मध्ये दोन जणांना अ वर्ग खरेदीदार परवान्यांचे वाटप केले होते. २०१८ मध्ये १० जणांनी परवाने घेतले होते. २०१९ मध्ये आतापर्यंत तब्बल २६६ परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यापैकी तब्बल १५४ परवान्यांचे वाटप सप्टेंबरमध्ये झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे परवाने दिले असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी कांदा-बटाटा अडत व्यापारी संघटनेनेही बोगस मतदारांची नोंदणी केली जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याविषयी लेखी पत्रही प्रशासनास दिले होते. मार्केटमधील व्यापारी राजेंद्र शेळके यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.शेवटच्या महिन्यात जे अ वर्ग खरेदीदाराचे परवाने वितरित केले आहेत, त्यामध्ये बोगस खरेदीदारांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. यापैकी अनेक जण परवान्यांसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष मार्केटमध्येही आलेले नाहीत. ज्या कालावधीमध्ये परवान्यांचे वितरण झाले, त्या कालावधीमधील सीसीटीव्ही कॅमेºयाचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे; परंतु प्रशासनाने त्याला नकार दिला आहे.सीसीटीव्ही चित्रणाची मागणीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये अ वर्ग खरेदीदार परवान्यांची खैरात वाटण्यात आली आहे. यामधील अनेकांनी प्रत्यक्षात मार्केटमध्ये येऊन परवान्यांसाठी अर्जही केलेला नाही. इच्छुक उमेदवारांनीही नोंदणी केलेली असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अर्ज दाखल झालेल्या कालावधीमधील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेºयांचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने चित्रीकरण देण्यास मनाई केली आहे.एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. याची चौकशी होऊन बोगस नोंदणी रद्द करण्यात यावी.- राजेंद्र शेळके,व्यापारी, कांदा मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई