शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:25 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बोगस मतदारांची नोंदणी सुरू झाली असून, कांदा मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. या परवान्यांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. प्रत्येक वर्षी जवळपास दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत आहे. प्रचंड आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व व्यापारी प्रतिनिधींमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते. २००८ मध्ये बाजार समितीची निवडणूक झाली होती. डिसेंबर २०१३ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. यानंतर जवळपास एक वर्ष संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली. तेव्हापासून अद्याप प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे.उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुंबई बाजार समितीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याचाच भाग म्हणून ३० नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. २९ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळावर जाण्यासाठी इच्छुक व्यापारी प्रतिनिधींनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. अ वर्ग खरेदीदारांची चौकशी करण्यात यावी व जे प्रत्यक्षात व्यापार करत नाहीत, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.कांदा-बटाटा मार्केटमध्ये २०१७ मध्ये दोन जणांना अ वर्ग खरेदीदार परवान्यांचे वाटप केले होते. २०१८ मध्ये १० जणांनी परवाने घेतले होते. २०१९ मध्ये आतापर्यंत तब्बल २६६ परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यापैकी तब्बल १५४ परवान्यांचे वाटप सप्टेंबरमध्ये झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे परवाने दिले असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी कांदा-बटाटा अडत व्यापारी संघटनेनेही बोगस मतदारांची नोंदणी केली जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याविषयी लेखी पत्रही प्रशासनास दिले होते. मार्केटमधील व्यापारी राजेंद्र शेळके यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.शेवटच्या महिन्यात जे अ वर्ग खरेदीदाराचे परवाने वितरित केले आहेत, त्यामध्ये बोगस खरेदीदारांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. यापैकी अनेक जण परवान्यांसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष मार्केटमध्येही आलेले नाहीत. ज्या कालावधीमध्ये परवान्यांचे वितरण झाले, त्या कालावधीमधील सीसीटीव्ही कॅमेºयाचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे; परंतु प्रशासनाने त्याला नकार दिला आहे.सीसीटीव्ही चित्रणाची मागणीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये अ वर्ग खरेदीदार परवान्यांची खैरात वाटण्यात आली आहे. यामधील अनेकांनी प्रत्यक्षात मार्केटमध्ये येऊन परवान्यांसाठी अर्जही केलेला नाही. इच्छुक उमेदवारांनीही नोंदणी केलेली असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अर्ज दाखल झालेल्या कालावधीमधील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेºयांचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने चित्रीकरण देण्यास मनाई केली आहे.एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. याची चौकशी होऊन बोगस नोंदणी रद्द करण्यात यावी.- राजेंद्र शेळके,व्यापारी, कांदा मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई