शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

शहरातील निराश्रितांची निवाऱ्यावाचून फरफट, पदपथांवर मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 00:49 IST

Navi Mumbai : महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील लोकसंख्येच्या अनुषंगाने शहरात विविध नोडमध्ये निवारा केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एकच निवारा केंद्र असल्याने शहरातील बेघर निराश्रित नागरिकांना पदपथ, रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत मुक्काम करावा लागत आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.बेघरांना वास्तव्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी न्यायालयाने ५ मे २०१० रोजी एक लाख लोकसंख्येमागे एक रात्र निवारा केंद्र महापालिकांनी उभारण्याचे आदेश दिले होते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या सूचनांचे पालन अद्याप करण्यात आलेले नाही. नवी मुंबई शहरात सुमारे ११ लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. देशातील विविध भागांतून नवी मुंबई शहरात आलेले परंतु निवाऱ्याची सोय नसलेले नागरिक नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत. नवी मुंबई शहरात महापालिकेने श्रमिक नगर येथील समाज मंदिर आणि तुर्भे सेक्टर २० येथे निवारा केंद्रे सुरू केली होती, परंतु विविध कारणांनी सदर केंद्रे बंद पडली आहेत. सध्या समहापालिकेचे सीबीडी सेक्टर ११ येथील उड्डाणपुलाखाली एकच निवारा केंद्र सुरू आहे. या निवारा केंद्रात कोरोना काळात सुमारे २५ बेघर नागरिक दाखल झाले होते. सध्या या ठिकाणी सुमारे १२ नागरिक वास्तव्य करीत आहेत.  महापालिकेच्या माध्यमातून घणसोली येथे निवारा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे, परंतु विविध कारणांस्तव सदर केंद्र सुरू झाले नाही तसेच कोपरखैरणे येथील केंद्राचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील बेघर नागरिकांची निवाऱ्यावाचून फरफट होत आहे.

बेघरांचे सर्वेक्षणही नाहीशहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने त्यांची संख्या माहीत असणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या माध्यमातून अद्याप सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई