शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

शहरातील निराश्रितांची निवाऱ्यावाचून फरफट, पदपथांवर मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 00:49 IST

Navi Mumbai : महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील लोकसंख्येच्या अनुषंगाने शहरात विविध नोडमध्ये निवारा केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एकच निवारा केंद्र असल्याने शहरातील बेघर निराश्रित नागरिकांना पदपथ, रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत मुक्काम करावा लागत आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.बेघरांना वास्तव्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी न्यायालयाने ५ मे २०१० रोजी एक लाख लोकसंख्येमागे एक रात्र निवारा केंद्र महापालिकांनी उभारण्याचे आदेश दिले होते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या सूचनांचे पालन अद्याप करण्यात आलेले नाही. नवी मुंबई शहरात सुमारे ११ लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. देशातील विविध भागांतून नवी मुंबई शहरात आलेले परंतु निवाऱ्याची सोय नसलेले नागरिक नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत. नवी मुंबई शहरात महापालिकेने श्रमिक नगर येथील समाज मंदिर आणि तुर्भे सेक्टर २० येथे निवारा केंद्रे सुरू केली होती, परंतु विविध कारणांनी सदर केंद्रे बंद पडली आहेत. सध्या समहापालिकेचे सीबीडी सेक्टर ११ येथील उड्डाणपुलाखाली एकच निवारा केंद्र सुरू आहे. या निवारा केंद्रात कोरोना काळात सुमारे २५ बेघर नागरिक दाखल झाले होते. सध्या या ठिकाणी सुमारे १२ नागरिक वास्तव्य करीत आहेत.  महापालिकेच्या माध्यमातून घणसोली येथे निवारा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे, परंतु विविध कारणांस्तव सदर केंद्र सुरू झाले नाही तसेच कोपरखैरणे येथील केंद्राचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील बेघर नागरिकांची निवाऱ्यावाचून फरफट होत आहे.

बेघरांचे सर्वेक्षणही नाहीशहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने त्यांची संख्या माहीत असणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या माध्यमातून अद्याप सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई