शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कायम कामगारांची भरती करावी

By admin | Updated: November 28, 2015 01:30 IST

महानगरपालिकेत कायम कामगारांच्या रिक्त जागा न भरता कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याची तक्रार कंत्राटी कामगारांनी केली आहे

नवी मुंबई : महानगरपालिकेत कायम कामगारांच्या रिक्त जागा न भरता कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याची तक्रार कंत्राटी कामगारांनी केली आहे. प्रशासनात कर्मचारी भरती करताना कायम कामगारांची भरती करण्याची लेखी मागणी काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार विभाग, नवी मुंबईच्या वतीने गुरुवारी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाने केली. कंत्राटी सेवा बंद करावी, असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून काम करवून घेत आहे. नागरी सुविधा पुरविण्याचे तसेच नागरी समस्या सोडविण्याचे काम आणि रुग्णालयीन आरोग्य सांभाळण्याचे काम कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून करवून घेतले जात आहे. डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांवर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेंतर्गत फवारणी, डास उत्पत्तीस्थळांची पाहणी याकरिता कंत्राटी कामगारांकडून जास्तीचे काम करवून घेतले जाते, अशी तक्रार कंत्राटी कामगारांनी केली. कंत्राटी कामगारांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार विभाग, नवी मुंबईचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळेच नवी मुंबई महापालिका प्रशासनाला राज्यात ‘संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियाना’त प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे. कंत्राटी कामगारांनी आपली सेवा कायम करण्यासाठी आजवर महापालिका मुख्यालय ते मंत्रालय अशी आंदोलने अनेक वेळा केली आहेत. न्यायालयाचे व मंत्र्यांचे दरवाजेही ठोठावले आहेत. तथापि या कामगारांची सेवा आजतागायत कायम झालेली नसल्याचे सांगत रवींद्र सावंत यांनी निवेदनातून नाराजी व्यक्त केली आहे.कामगारांना कंत्राटी तत्त्वावरच ठेकेदारांच्या माध्यमातून काम करावे लागत आहे. सेवा कायमस्वरूपी आवश्यक असतानाही कंत्राटी पद्धतीने का करवून घेत आहे, ठेकेदारांचे चोचले पुरविण्यासाठी कंत्राटी संकल्पना राबविली जात असल्याची माहिती सावंत यांनी दिली.