शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला २६ कोटींची वसुली ?

By admin | Updated: May 9, 2017 01:36 IST

शहरात सुरू असलेल्या डंपरमधील ओव्हरलोड वाहतुकीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे.

कमलाकर कांबळे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात सुरू असलेल्या डंपरमधील ओव्हरलोड वाहतुकीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यासाठी प्रत्येक डंपरमागे महिन्याला हप्ता वसूल केला जातो. वसुलीची ही रक्कम प्रति महिना जवळपास २६ कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. याप्रकाराला संबंधित आरटीओ कार्यालयांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.मुंबईच्या विविध उपनगरांत सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी खडी, रेती आणि क्रॅश सॅण्ड रायगड जिल्ह्यातील उरण व पनवेल परिसरातून पुरविली जाते. हे साहित्य पुरविण्यासाठी दीड हजारापेक्षा अधिक डंपर दिवस-रात्र मुंबईत फेऱ्या मारतात. विशेष म्हणजे यातील बहुतांशी डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेला असतो. या प्रकाराला संबंधित आरटीओचे अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. नाव न छापण्याच्या अटीवर वाहतूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार ओव्हरलोड वाहतुकीसाठी प्रत्येक डंपरमागे महिन्याला १७,५00 रुपयांचा हप्ता घेतला जातो. एकूण डंपरच्या प्रमाणात हप्त्याचा हा आकडा प्रति महिना २६ कोटींच्या घरात असल्याची खळबळजनक माहिती सूत्राने दिली. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यास अनेक डंपर चालकांचा विरोध आहे. ओव्हरलोड वाहतूक केल्याने डंपरचे नुकसान होते. टायर फुटून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच अवैध वाहतूक करताना अपघात झाल्यास इन्शुरन्सही मिळत नाही. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होते. उड्डाणपुलाला तडे जातात. या सर्व पार्श्वभूमीवर क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच परिवहन आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतल्याचे समजते. महेश झगडे हे परिवहन आयुक्त असताना त्यांनी राज्यातील आरटीओ कार्यालये दलालमुक्त केले होते. तसेच कठोर निर्णय घेवून ओव्हरलोड वाहतुकीला आळा घातला होता. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित आरटीओला दिले होते. त्यामुळे काही काळातच या गैरप्रकाराला आळा बसला होता. परंतु परिवहन आयुक्तपदावरून त्यांची बदली होताच परिवहन (आरटीओ) कार्यालयांना पुन्हा दलालांचा विळखा पडला आहे. राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. नवी मुंबईत तर अवैध माल वाहतुकीने कळस गाठला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. परंतु त्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने आरटीओच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.