शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

महिन्याला २६ कोटींची वसुली ?

By admin | Updated: May 9, 2017 01:36 IST

शहरात सुरू असलेल्या डंपरमधील ओव्हरलोड वाहतुकीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे.

कमलाकर कांबळे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात सुरू असलेल्या डंपरमधील ओव्हरलोड वाहतुकीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यासाठी प्रत्येक डंपरमागे महिन्याला हप्ता वसूल केला जातो. वसुलीची ही रक्कम प्रति महिना जवळपास २६ कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. याप्रकाराला संबंधित आरटीओ कार्यालयांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.मुंबईच्या विविध उपनगरांत सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी खडी, रेती आणि क्रॅश सॅण्ड रायगड जिल्ह्यातील उरण व पनवेल परिसरातून पुरविली जाते. हे साहित्य पुरविण्यासाठी दीड हजारापेक्षा अधिक डंपर दिवस-रात्र मुंबईत फेऱ्या मारतात. विशेष म्हणजे यातील बहुतांशी डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेला असतो. या प्रकाराला संबंधित आरटीओचे अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. नाव न छापण्याच्या अटीवर वाहतूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार ओव्हरलोड वाहतुकीसाठी प्रत्येक डंपरमागे महिन्याला १७,५00 रुपयांचा हप्ता घेतला जातो. एकूण डंपरच्या प्रमाणात हप्त्याचा हा आकडा प्रति महिना २६ कोटींच्या घरात असल्याची खळबळजनक माहिती सूत्राने दिली. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यास अनेक डंपर चालकांचा विरोध आहे. ओव्हरलोड वाहतूक केल्याने डंपरचे नुकसान होते. टायर फुटून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच अवैध वाहतूक करताना अपघात झाल्यास इन्शुरन्सही मिळत नाही. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होते. उड्डाणपुलाला तडे जातात. या सर्व पार्श्वभूमीवर क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच परिवहन आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतल्याचे समजते. महेश झगडे हे परिवहन आयुक्त असताना त्यांनी राज्यातील आरटीओ कार्यालये दलालमुक्त केले होते. तसेच कठोर निर्णय घेवून ओव्हरलोड वाहतुकीला आळा घातला होता. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित आरटीओला दिले होते. त्यामुळे काही काळातच या गैरप्रकाराला आळा बसला होता. परंतु परिवहन आयुक्तपदावरून त्यांची बदली होताच परिवहन (आरटीओ) कार्यालयांना पुन्हा दलालांचा विळखा पडला आहे. राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. नवी मुंबईत तर अवैध माल वाहतुकीने कळस गाठला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. परंतु त्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने आरटीओच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.