शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

रत्नागिरी : जिल्ह्यात १ कोटी ६९ लाखांची हानी

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

दरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली.

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्ता यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. यात १ कोटी ६९ लाख रूपयांचे नुकसान झाले. यादरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली. मात्र, पंचनामे अजूनही सुरू असल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यात सध्या निवडणुकीचे काम सुरू असल्याने या नागरिकांना निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या घरांचीे संख्या १९, अंशत: नुकसान झालेल्या घरांची संख्या ८०६, पूर्ण पडझड झालेल्या गोठ्यांची संख्या १८, तर अंशत: पडझड गोठ्यांची संख्या ८८ इतकी आहे. या सर्वांचे मिळून ९७ लाख ३१ हजार ४९९ रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी केवळ ८१ घरे, गोठे यांना मदत देण्यात आली आहे. तसेच या चार महिन्यांच्या कालावधीत ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगी मालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण ६९ लाख ३२ हजार १६१ रूपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी अद्याप कोणालाच मदत देण्यात आलेली नाही.या कालावधीत १७ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यात वीज पडून ३, पुरात वाहून गेलेले ३, दरड, भिंत पडून २ आणि अन्य कारणांनी ९ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे तत्काळ मदत देण्यात आली असून, १० प्रकरणे अपात्र ठरली आहेत. एक प्रकरण मदतीच्या अपेक्षेत आहे. या कालावधीत ८ जनावरे मृत झाली असून, १ लाख ९४ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या मालकांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. अजूनही पंचनामे होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)आपदग्रस्त घरे, गोठे, मृत्यु पावलेल्या व्यक्ती, जनावरे, नुकसान झालेली सार्वजनिक व खासगी मालमत्ता यांची तालुकानिहाय आकडेवारीतालुकाघरेगोठेव्यक्तीजनावरेसार्वजनिक खासगी मंडणगड४३०१००११०१ दापोली५६०८०0०८०६खेड३९१३०२०१०३ गुहागर६११५०००२०० चिपळूण१२७१५०१२२०३ संगमेश्वर२५९१९०१३१०३० रत्नागिरी८६१७०१०००३लांजा८७१६०११३००राजापूर६७०५०२१४०२एकूण८२५१०६०८०८३१४७