शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

डाळी, कडधान्याचे दर पाच वर्षांत दुप्पट; जीएसटीमुळे वस्तूंचे दर पुन्हा भडकणार

By नामदेव मोरे | Updated: August 3, 2022 11:33 IST

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशभर जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पाच वर्षांमध्ये डाळी, कडधान्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इंधन दरवाढ व शासनाच्या धोरणांमुळे दरवाढ होत असून, जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. 

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे. उत्पन्न घटले असताना खर्चामध्ये मात्र सातत्याने वाढ होऊ लागली आहे. किमान डाळी, कडधान्य व अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. परंतु या वस्तूंवरही शासनाने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईमध्ये भर पडू लागली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबई बाजार समितीमध्ये ४० ते ४६ रुपये किलो दराने विकली जाणारी मसूरडाळ आता ८२ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे. मूगडाळ ५६ ते ६२ वरून ८५ ते १०५ रुपयांवर गेली आहे. तूरडाळ, उडीदडाळीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशीच स्थिती राहिली तर महिन्याचा घरखर्च भागविणेही मुश्कील होईल, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. 

पाच वर्षांमध्ये इंधनदरामध्ये झालेली वाढ व इतर कारणांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. शासनाने ५ टक्के जीएसटी लावल्यामुळे महागाईमध्ये अजून भर पडली आहे. - भीमजी भानुशाली, सचिव ग्रोमा  

टॅग्स :GSTजीएसटीInflationमहागाई