शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

डाळी, कडधान्याचे दर पाच वर्षांत दुप्पट; जीएसटीमुळे वस्तूंचे दर पुन्हा भडकणार

By नामदेव मोरे | Updated: August 3, 2022 11:33 IST

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशभर जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पाच वर्षांमध्ये डाळी, कडधान्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इंधन दरवाढ व शासनाच्या धोरणांमुळे दरवाढ होत असून, जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. 

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे. उत्पन्न घटले असताना खर्चामध्ये मात्र सातत्याने वाढ होऊ लागली आहे. किमान डाळी, कडधान्य व अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. परंतु या वस्तूंवरही शासनाने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईमध्ये भर पडू लागली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबई बाजार समितीमध्ये ४० ते ४६ रुपये किलो दराने विकली जाणारी मसूरडाळ आता ८२ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे. मूगडाळ ५६ ते ६२ वरून ८५ ते १०५ रुपयांवर गेली आहे. तूरडाळ, उडीदडाळीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशीच स्थिती राहिली तर महिन्याचा घरखर्च भागविणेही मुश्कील होईल, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. 

पाच वर्षांमध्ये इंधनदरामध्ये झालेली वाढ व इतर कारणांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. शासनाने ५ टक्के जीएसटी लावल्यामुळे महागाईमध्ये अजून भर पडली आहे. - भीमजी भानुशाली, सचिव ग्रोमा  

टॅग्स :GSTजीएसटीInflationमहागाई