शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

डाळी, कडधान्याचे दर पाच वर्षांत दुप्पट; जीएसटीमुळे वस्तूंचे दर पुन्हा भडकणार

By नामदेव मोरे | Updated: August 3, 2022 11:33 IST

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशभर जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पाच वर्षांमध्ये डाळी, कडधान्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इंधन दरवाढ व शासनाच्या धोरणांमुळे दरवाढ होत असून, जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. 

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे. उत्पन्न घटले असताना खर्चामध्ये मात्र सातत्याने वाढ होऊ लागली आहे. किमान डाळी, कडधान्य व अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. परंतु या वस्तूंवरही शासनाने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईमध्ये भर पडू लागली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबई बाजार समितीमध्ये ४० ते ४६ रुपये किलो दराने विकली जाणारी मसूरडाळ आता ८२ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे. मूगडाळ ५६ ते ६२ वरून ८५ ते १०५ रुपयांवर गेली आहे. तूरडाळ, उडीदडाळीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशीच स्थिती राहिली तर महिन्याचा घरखर्च भागविणेही मुश्कील होईल, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. 

पाच वर्षांमध्ये इंधनदरामध्ये झालेली वाढ व इतर कारणांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. शासनाने ५ टक्के जीएसटी लावल्यामुळे महागाईमध्ये अजून भर पडली आहे. - भीमजी भानुशाली, सचिव ग्रोमा  

टॅग्स :GSTजीएसटीInflationमहागाई