शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

कर्जतमधील रानमेवा होतोय दुर्मीळ

By admin | Updated: April 6, 2016 04:14 IST

गेल्या काही वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात बोरं, करवंदे, तोरणं यासारख्या फळांचा रानमेवा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत होता.

नेरळ : गेल्या काही वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात बोरं, करवंदे, तोरणं यासारख्या फळांचा रानमेवा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत होता. परंतु सध्या हा रानमेवा दुर्मीळ होत आहे. लहान -थोरांना आवडणारा हा रानमेवा ठरावीक ठिकाणीच बहरताना दिसत आहे. सततच्या वणव्यांच्या घटनांमुळे येथील वनसंपदा धोक्यात आल्याने हा रानमेवा नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.काही वर्षांपूर्वी आंबट-गोड बोरं, करवंदे, तोरणं अशा अनेक फळांची रेलचेल असायची. परंतु कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात या रानमेव्यांची झाडे कमी होत असल्याचे दिसून येत आहेत. बाजारात, चौकात, शाळेच्या बाहेर रानमेवा फळांचे विक्रे ते दिसायचे. ही फळे घेण्यासाठी शाळेची मुले मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. अलीकडे गावरान बोरांची जागा आता इलायची बोरांनी घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून झाडांची कत्तल होत असल्याने या भागात बोरं-करवंदे कमी प्रमाणात दिसत आहेत. तालुक्यातील आदिवासी समाजातील महिल ही फळे काढून आणतात व बाजारात विकतात. परंतु खूप कष्ट करून काढलेल्या या फळांना कमी प्रमाणात भाव मिळतो. या फळांना शहरी भागात मोठी मागणी असली तरी ग्रामीण भागात मात्र या झाडांची संख्या कमी होत असल्याने ही फळे कमी प्रमाणात दिसत आहेत.