शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 22:05 IST

चाणजे, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना १०-१५ दिवसात एकदाच पाणी : जगप्रसिध्द घारापुरी बेटावर तर होडीने पाणी पुरवठा

मधुकर ठाकूर

उरण :उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती व औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तर पुर्व विभागातील १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातही पाणीसाठा आटल्याने उरण परिसरातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

उरण परिसरातील २५ ग्रामपंचायती आणि औद्योगिक प्रकल्पास सुमारे दोन लाख लोकसंख्येला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.अपुऱ्या पावसामुळे यावर्षी रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तसेच उरण परिसरातील अनेक गावातील विहीरी, तलाव यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उरण परिसरातील २५ ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीं पैकी चाणजे आणि केगाव या दोन ग्रामपंचायतींमधील गावांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाई भेडसावत आहे.चाणजे ग्रामपंचायतीची लोकसंख्या

३० हजारांहून अधिक आहे.लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठी ग्रामपंचायत चाणजे ग्रामपंचायत ओळखली जाते.करंजा,नवापाडा,सातघर, सुरकीचापाडा,चाणजे, डाऊरनगर आदी पाडे व गावातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे.चाणजे हद्दीतील नागरिकांना १५ दिवसातुन एकदा तेही फक्त एकच तास पाणी दिले जात आहे.चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाच्या अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. एमआयडीसीकडूनही ग्रामपंचायतीच्या मागणी प्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि पाणी पुरवठ्याबाबत योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने मात्र राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या विविध योजना कुचकामी ठरल्या आहेत.परिणामी चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील २० हजार नागरिकांनाही मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना ८-१० दिवसात फक्त एक दिवस एक तासच पाणी पुरवठा केला जात आहे.मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी व योग्य दाबाने पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी ६ इंचाची व्यासाची पाईप लाईन टाकण्याची मागणी केली जात आहे.मात्र यासाठी एमआयडीसी व ग्रामपंचायतींमध्ये फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.परिणामी नागरिकांसाठी पाणी टंचाई ही कायमची समस्या बनली आहे.

जगप्रसिध्द घारापुरी बेटावरही राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर या तीन गावांना पाणीपुरवठा करणारे धरण डिसेंबरमध्येच आटल्याने पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. बेटवासियांना समुद्रमार्गे होडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने शासनाकडे  केली आहे .मात्र  ग्रामपंचायतीच्या मागणीनंतरही शासकीय यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे घारापुरी बेट पाण्याचे दुर्भिक्ष बनले असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा निधीतून मुंबईतील पीरपाव बंदरातून होडीतून टाक्या भरून पाणी आणून गुरुवारपासून बेटवासियांना पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुनाडे धरणातून मागील अनेक वर्षांपासून पुनाडे, वशेणी, सारडे,कडापे,पिरकोन, पाले,गोवठणे,आवरे, पाणदिवे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ३५ वर्ष जुन्या धरणाला सातत्याने लागलेली गळती दूर करण्यासाठी आणि साचलेला गाळ काढण्यात शासकीय विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.यामुळे पुनाडे धरण पुर्णता गाळाने भरल्याने या ९ गावातील २० हजार नागरिकांना सध्या पाणी टंचाईने ग्रासले आहे.याआधी प्रत्येक गावात एक दिवस आड तासभर पाणी सोडण्यात येत होते.मात्र पुनाडे धरणाने तळ गाठल्याने आता तीन दिवसांआड एकदिवस एक तास पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना कमिटीच्या अध्यक्षा अनामिक म्हात्रे यांनी दिली.

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली असल्याने दररोज सिडकोच्या हेटवणे धरणातून चार एमएलडी पाणी उसणे घेऊन नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहोत.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उरणमध्ये यापुर्वीच दोन दिवस पाणी कपातही लागू केली आहे. नागरिकांनीही जुन महिना अथवा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने व जपुन करण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई