शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 22:05 IST

चाणजे, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना १०-१५ दिवसात एकदाच पाणी : जगप्रसिध्द घारापुरी बेटावर तर होडीने पाणी पुरवठा

मधुकर ठाकूर

उरण :उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती व औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तर पुर्व विभागातील १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातही पाणीसाठा आटल्याने उरण परिसरातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

उरण परिसरातील २५ ग्रामपंचायती आणि औद्योगिक प्रकल्पास सुमारे दोन लाख लोकसंख्येला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.अपुऱ्या पावसामुळे यावर्षी रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तसेच उरण परिसरातील अनेक गावातील विहीरी, तलाव यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उरण परिसरातील २५ ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीं पैकी चाणजे आणि केगाव या दोन ग्रामपंचायतींमधील गावांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाई भेडसावत आहे.चाणजे ग्रामपंचायतीची लोकसंख्या

३० हजारांहून अधिक आहे.लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठी ग्रामपंचायत चाणजे ग्रामपंचायत ओळखली जाते.करंजा,नवापाडा,सातघर, सुरकीचापाडा,चाणजे, डाऊरनगर आदी पाडे व गावातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे.चाणजे हद्दीतील नागरिकांना १५ दिवसातुन एकदा तेही फक्त एकच तास पाणी दिले जात आहे.चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाच्या अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. एमआयडीसीकडूनही ग्रामपंचायतीच्या मागणी प्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि पाणी पुरवठ्याबाबत योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने मात्र राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या विविध योजना कुचकामी ठरल्या आहेत.परिणामी चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील २० हजार नागरिकांनाही मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना ८-१० दिवसात फक्त एक दिवस एक तासच पाणी पुरवठा केला जात आहे.मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी व योग्य दाबाने पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी ६ इंचाची व्यासाची पाईप लाईन टाकण्याची मागणी केली जात आहे.मात्र यासाठी एमआयडीसी व ग्रामपंचायतींमध्ये फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.परिणामी नागरिकांसाठी पाणी टंचाई ही कायमची समस्या बनली आहे.

जगप्रसिध्द घारापुरी बेटावरही राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर या तीन गावांना पाणीपुरवठा करणारे धरण डिसेंबरमध्येच आटल्याने पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. बेटवासियांना समुद्रमार्गे होडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने शासनाकडे  केली आहे .मात्र  ग्रामपंचायतीच्या मागणीनंतरही शासकीय यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे घारापुरी बेट पाण्याचे दुर्भिक्ष बनले असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा निधीतून मुंबईतील पीरपाव बंदरातून होडीतून टाक्या भरून पाणी आणून गुरुवारपासून बेटवासियांना पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुनाडे धरणातून मागील अनेक वर्षांपासून पुनाडे, वशेणी, सारडे,कडापे,पिरकोन, पाले,गोवठणे,आवरे, पाणदिवे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ३५ वर्ष जुन्या धरणाला सातत्याने लागलेली गळती दूर करण्यासाठी आणि साचलेला गाळ काढण्यात शासकीय विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.यामुळे पुनाडे धरण पुर्णता गाळाने भरल्याने या ९ गावातील २० हजार नागरिकांना सध्या पाणी टंचाईने ग्रासले आहे.याआधी प्रत्येक गावात एक दिवस आड तासभर पाणी सोडण्यात येत होते.मात्र पुनाडे धरणाने तळ गाठल्याने आता तीन दिवसांआड एकदिवस एक तास पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना कमिटीच्या अध्यक्षा अनामिक म्हात्रे यांनी दिली.

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली असल्याने दररोज सिडकोच्या हेटवणे धरणातून चार एमएलडी पाणी उसणे घेऊन नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहोत.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उरणमध्ये यापुर्वीच दोन दिवस पाणी कपातही लागू केली आहे. नागरिकांनीही जुन महिना अथवा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने व जपुन करण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई