शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 22:05 IST

चाणजे, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना १०-१५ दिवसात एकदाच पाणी : जगप्रसिध्द घारापुरी बेटावर तर होडीने पाणी पुरवठा

मधुकर ठाकूर

उरण :उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती व औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तर पुर्व विभागातील १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातही पाणीसाठा आटल्याने उरण परिसरातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

उरण परिसरातील २५ ग्रामपंचायती आणि औद्योगिक प्रकल्पास सुमारे दोन लाख लोकसंख्येला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.अपुऱ्या पावसामुळे यावर्षी रानसई धरणाने डिसेंबरलाच तळ गाठला आहे.तसेच उरण परिसरातील अनेक गावातील विहीरी, तलाव यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उरण परिसरातील २५ ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीं पैकी चाणजे आणि केगाव या दोन ग्रामपंचायतींमधील गावांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाई भेडसावत आहे.चाणजे ग्रामपंचायतीची लोकसंख्या

३० हजारांहून अधिक आहे.लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठी ग्रामपंचायत चाणजे ग्रामपंचायत ओळखली जाते.करंजा,नवापाडा,सातघर, सुरकीचापाडा,चाणजे, डाऊरनगर आदी पाडे व गावातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे.चाणजे हद्दीतील नागरिकांना १५ दिवसातुन एकदा तेही फक्त एकच तास पाणी दिले जात आहे.चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाच्या अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. एमआयडीसीकडूनही ग्रामपंचायतीच्या मागणी प्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि पाणी पुरवठ्याबाबत योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने मात्र राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या विविध योजना कुचकामी ठरल्या आहेत.परिणामी चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील २० हजार नागरिकांनाही मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना ८-१० दिवसात फक्त एक दिवस एक तासच पाणी पुरवठा केला जात आहे.मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी व योग्य दाबाने पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी ६ इंचाची व्यासाची पाईप लाईन टाकण्याची मागणी केली जात आहे.मात्र यासाठी एमआयडीसी व ग्रामपंचायतींमध्ये फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.परिणामी नागरिकांसाठी पाणी टंचाई ही कायमची समस्या बनली आहे.

जगप्रसिध्द घारापुरी बेटावरही राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर या तीन गावांना पाणीपुरवठा करणारे धरण डिसेंबरमध्येच आटल्याने पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. बेटवासियांना समुद्रमार्गे होडीने पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने शासनाकडे  केली आहे .मात्र  ग्रामपंचायतीच्या मागणीनंतरही शासकीय यंत्रणा निधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे घारापुरी बेट पाण्याचे दुर्भिक्ष बनले असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा निधीतून मुंबईतील पीरपाव बंदरातून होडीतून टाक्या भरून पाणी आणून गुरुवारपासून बेटवासियांना पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुनाडे धरणातून मागील अनेक वर्षांपासून पुनाडे, वशेणी, सारडे,कडापे,पिरकोन, पाले,गोवठणे,आवरे, पाणदिवे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ३५ वर्ष जुन्या धरणाला सातत्याने लागलेली गळती दूर करण्यासाठी आणि साचलेला गाळ काढण्यात शासकीय विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.यामुळे पुनाडे धरण पुर्णता गाळाने भरल्याने या ९ गावातील २० हजार नागरिकांना सध्या पाणी टंचाईने ग्रासले आहे.याआधी प्रत्येक गावात एक दिवस आड तासभर पाणी सोडण्यात येत होते.मात्र पुनाडे धरणाने तळ गाठल्याने आता तीन दिवसांआड एकदिवस एक तास पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना कमिटीच्या अध्यक्षा अनामिक म्हात्रे यांनी दिली.

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली असल्याने दररोज सिडकोच्या हेटवणे धरणातून चार एमएलडी पाणी उसणे घेऊन नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहोत.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उरणमध्ये यापुर्वीच दोन दिवस पाणी कपातही लागू केली आहे. नागरिकांनीही जुन महिना अथवा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने व जपुन करण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई