शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, एकतेचे प्रतीक उभे राहणार आहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:34 IST

राघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन : श्रीराम मंदिर निर्माण अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : ‘श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन करण्याची वेळ यावी, ही आनंददायी की खेदाची बाब आहे, हे कळत नाही. देशात लाखो मंदिरे उभी आहेत; मग हे मंदिर कशासाठी? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. याबाबत सांगायचे तर श्रीराम आपल्या कणाकणांत आहेत. ईश्वराचे एक मूळ स्थान आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. हा त्याचा गर्भितार्थ आहे. पाचशे वर्षे लागलेला कलंक आपल्याला पुसायचा आहे. यासाठी अनेकांचे बलिदान आहे. राममंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे, एकतेचे, संस्काराचे प्रतीक उभे राहणार आहे.' असे स्पष्ट प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी शुक्रवारी येथे केले.

अयोध्येत श्रीरामांचे भव्य असे मंदिर उभे राहत आहे आणि याकरिता सर्व देशभर श्रीराम मंदिर निर्माण अभियान सुरू आहे. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अभियान राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात म्हणून विठ्ठलनगरमधील सावली सोसायटीमध्ये राममंदिर निर्माण संपर्क अभियान कर्जत तालुक्याच्या वतीने संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील अभियान कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे, तर प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुका संघचालक विनायक चितळे, तालुका अभियानप्रमुख दिनेश रणदिवे व्यासपीठावर उपस्थित होते. जैन श्वेतांबर समाजाच्या वतीने २१ हजार रुपयांचा धनादेश आणि सतीश दत्तात्रेय श्रीखंडे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई