शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरची आरोग्य यंत्रणा रामभरोसे

By admin | Updated: May 14, 2016 00:59 IST

दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. तापमान वाढल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे.

प्रकाश कदम , पोलादपूरदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. तापमान वाढल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. मात्र तरीही शासन दरबारी रुग्णसेवेबाबत कमालीची अनास्था असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठ उपकेंद्रे आणि एक ग्रामीण रु ग्णालय आहे. परसुले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ नावालाच मंजूर असून समस्यांशिवाय येथे काहीच नाही. कोणत्याही सुविधा नसताना घाईघाईत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वत:ची इमारत नाही. इतकेच नव्हे तर कर्मचारी व अधिकारी वर्गही मंजूर नाही. उपचारासाठी येणारे रुग्ण सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम २०-२५ वर्षांपूर्वी छोट्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. आजूबाजूच्या ४२ गावांतील सुमारे २२ हजार रु ग्ण येथे उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन उपकेंद्रे आहेत. रुग्ण वाढल्याने ही इमारत कमी पडत आहे. याशिवाय रुग्णांना अनेकदा बाहेरून औषधे खरेदी करावे लागतात. रुग्णांकरिता एक रुग्णवाहिका येथे उपलब्ध आहे. याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असले तरी एक शैक्षणिक रजेवर आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण रु ग्णालय हे केवळ रेफर सेंटर बनले असून प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱ्याच सुविधा येथे मिळतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,रिक्त पदे, सुविधांची वानवा या प्रमुख समस्या असून याबाबत अनेक वेळा तक्र ारी करूनही रुग्णालय प्रशासन सुधारण्यास तयार नाही. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, यंत्रणेशिवाय चाललेल्या रु ग्णालयाची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी झाली आहे. अत्यवस्थ रुग्ण दाखल केल्यानंतर उपचार लांबच, नातेवाइकांना अधिक उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितले जाते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना नो एंट्री असा अलिखित नियम या रु ग्णालयात बनला आहे. रुग्णालयातील जबाबदार अधिकारी वर्गाची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे लहान मोठ्या शस्त्रक्रि येबाबत पुढे पाठवले जात असल्याने ग्रामीण रु ग्णालय आहे की रेफर सेंटर असा प्रश्न रु ग्णांना पडतो. गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी महाड शासकीय रु ग्णालय किंवा मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले जाते. ग्रामीण रु ग्णालयाबरोबरच रु ग्णांची परिस्थिती रामभरोसे आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये ३0 खाटांची क्षमता आहे. येथे ग्रामीण भागातील रु ग्ण येत असतात. शासनाने लाखो रु पये खर्च करून रुग्णालय उभारले. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे हे रु ग्णालय रु ग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे. महत्त्वाची असलेली पदेच रिक्त असल्याने रु ग्ण सेवा विस्कळीत आहे.तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे रु ग्णालय ओपीडीवरच जास्त चालले आहे.रिक्त पदांमुळे रु ग्णांना उपचार मिळत नसल्याने तालुक्यातील नागरिकांत आरोग्य यंत्रणेबाबत प्रचंड रोष आहे. गेली चार वर्षे येथे प्रसूतीतज्ज्ञ हे पद रिक्त असल्याने सर्व डिलिवरीचे रु ग्ण महाडमध्ये पाठवले जातात. फक्त ओपीडी रु ग्णांसाठी हे रु ग्णालय चालू आहे का,हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कशेडी व आंबेनळी हे दोन घाट पोलादपूरपासून सुरु होतात त्यामुळे ग्रामीण रु ग्णालय सुसज्ज असायला हवे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.