शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरची आरोग्य यंत्रणा रामभरोसे

By admin | Updated: May 14, 2016 00:59 IST

दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. तापमान वाढल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे.

प्रकाश कदम , पोलादपूरदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. तापमान वाढल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. मात्र तरीही शासन दरबारी रुग्णसेवेबाबत कमालीची अनास्था असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठ उपकेंद्रे आणि एक ग्रामीण रु ग्णालय आहे. परसुले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ नावालाच मंजूर असून समस्यांशिवाय येथे काहीच नाही. कोणत्याही सुविधा नसताना घाईघाईत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वत:ची इमारत नाही. इतकेच नव्हे तर कर्मचारी व अधिकारी वर्गही मंजूर नाही. उपचारासाठी येणारे रुग्ण सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम २०-२५ वर्षांपूर्वी छोट्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. आजूबाजूच्या ४२ गावांतील सुमारे २२ हजार रु ग्ण येथे उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन उपकेंद्रे आहेत. रुग्ण वाढल्याने ही इमारत कमी पडत आहे. याशिवाय रुग्णांना अनेकदा बाहेरून औषधे खरेदी करावे लागतात. रुग्णांकरिता एक रुग्णवाहिका येथे उपलब्ध आहे. याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असले तरी एक शैक्षणिक रजेवर आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण रु ग्णालय हे केवळ रेफर सेंटर बनले असून प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱ्याच सुविधा येथे मिळतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,रिक्त पदे, सुविधांची वानवा या प्रमुख समस्या असून याबाबत अनेक वेळा तक्र ारी करूनही रुग्णालय प्रशासन सुधारण्यास तयार नाही. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, यंत्रणेशिवाय चाललेल्या रु ग्णालयाची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी झाली आहे. अत्यवस्थ रुग्ण दाखल केल्यानंतर उपचार लांबच, नातेवाइकांना अधिक उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितले जाते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना नो एंट्री असा अलिखित नियम या रु ग्णालयात बनला आहे. रुग्णालयातील जबाबदार अधिकारी वर्गाची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे लहान मोठ्या शस्त्रक्रि येबाबत पुढे पाठवले जात असल्याने ग्रामीण रु ग्णालय आहे की रेफर सेंटर असा प्रश्न रु ग्णांना पडतो. गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी महाड शासकीय रु ग्णालय किंवा मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले जाते. ग्रामीण रु ग्णालयाबरोबरच रु ग्णांची परिस्थिती रामभरोसे आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये ३0 खाटांची क्षमता आहे. येथे ग्रामीण भागातील रु ग्ण येत असतात. शासनाने लाखो रु पये खर्च करून रुग्णालय उभारले. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे हे रु ग्णालय रु ग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे. महत्त्वाची असलेली पदेच रिक्त असल्याने रु ग्ण सेवा विस्कळीत आहे.तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे रु ग्णालय ओपीडीवरच जास्त चालले आहे.रिक्त पदांमुळे रु ग्णांना उपचार मिळत नसल्याने तालुक्यातील नागरिकांत आरोग्य यंत्रणेबाबत प्रचंड रोष आहे. गेली चार वर्षे येथे प्रसूतीतज्ज्ञ हे पद रिक्त असल्याने सर्व डिलिवरीचे रु ग्ण महाडमध्ये पाठवले जातात. फक्त ओपीडी रु ग्णांसाठी हे रु ग्णालय चालू आहे का,हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कशेडी व आंबेनळी हे दोन घाट पोलादपूरपासून सुरु होतात त्यामुळे ग्रामीण रु ग्णालय सुसज्ज असायला हवे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.