शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

पावसामुळे फरसबी, टोमॅटाेचे दर घसरले; ग्राहकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 12:48 IST

१० टक्के भाजीपाला खराब, बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास ६०० ट्रक, टेम्पोमधून जवळपास ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती.

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या व्यापारावर झाला आहे. बाजार समितीमधील आवक कमी झाली असून ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे फरसबी, गवार, टोमॅटाेसह इतर भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. तर पावसामुळे १० ते १५ टक्के भाजीपाला खराब झाल्याने फेकून द्यावा लागला आहे. 

बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास ६०० ट्रक, टेम्पोमधून जवळपास ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती. यामध्ये साडेपाच लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. बुधवारी पावसामुळे फक्त ५२० वाहनांची आवक झाली आहे. फक्त २५८४ टन मालाची आवक झाली असून त्यामध्ये ३ लाख ६५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. पावसामुळे रोडवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. यामुळे ते भाजीपाला खरेदीसाठी मार्केटमध्ये आलेच नाहीत, परिणामी बाजारभाव घसरले. 

पावसामुळे आवक कमी झाली आहे. ग्राहकांची संख्याही कमी झाल्याने बाजारभाव घसरले आहेत. तसेच  टोमॅटो व इतर काही कृषी माल १० ते १५ टक्के खराब झाला आहे.    - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट 

बाजार समितीमध्ये पुणे, सातारा, नाशिक व इतर जिल्ह्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सद्यस्थितीमध्ये फरसबी, गवार, काकडी, कारली, कोबी व इतर वस्तूंचे दर घसरले आहेत. गाजर, कोबी, टोमॅटो, भेंडी यांची आवक जास्त झाली आहे.