शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शेतकऱ्यांना पावसाचा फटका; ४० टन भाजीपाल्याची विक्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:08 IST

मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही. धान्य व फळ मार्केटमध्येही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये सोमवारी १७३४ वाहनांमधून कृषी माल विक्रीला आला होता. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्यामुळे फक्त १२६० गाड्यांची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५५० वाहनांमधून तब्बल १६४ टन कृषी माल विक्रीसाठी आला होता. नाशिक, पुणे, सातारा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आला होता. भिजल्यामुळे जवळपास १० टन माल फेकून द्यावा लागला. मुंबईमधून किरकोळ विक्रेते माल खरेदी करण्यासाठी आलेच नाहीत. यामुळे तब्बल २५ टक्के मालाची विक्रीच झालेली नाही. मार्केटमध्ये ४० टनपेक्षा जास्त माल दिवसभर पडून होता. बुधवारी कमी दराने या मालाची विक्री करावी लागण्याची शक्यता आहे. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भाजीपाला मार्केटबरोबर धान्य मार्केटमधील व्यवहारावरही परिणाम झाला आहे. सोमवारी मार्केटमध्ये ४१९ वाहनांची आवक झाली होती. मंगळवारी फक्त २०८ वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली आहे. मसाला मार्केटमध्येही ५० टक्के आवक कमी झाली आहे. आवक कमी असूनही ग्राहकच नसल्यामुळे कृषी मालाची विक्री होऊ शकली नाही. बाजारभावामध्ये फरक पडला नसला तरी पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील आठवड्यात भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.पावसामुळे मुंबई व उपनगरांमधून किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी पुरेशा प्रमाणात आले नाहीत. यामुळे २५ टक्के मालाची विक्री होऊ शकली नाही.- शंकर पिंगळे,व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसीकांदा - बटाटा मार्केटमध्येही आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. सोमवारी २५९ वाहनांची आवक झाली होती. मुसळधार पावसामुळे मंगळवारी फक्त १७४ वाहनांमधून कांदा, बटाटा व लसूणची आवक झाली आहे.- सुरेश शिंदे,व्यापारी, कांदा मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती