शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

शेतकऱ्यांना पावसाचा फटका; ४० टन भाजीपाल्याची विक्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:08 IST

मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही. धान्य व फळ मार्केटमध्येही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये सोमवारी १७३४ वाहनांमधून कृषी माल विक्रीला आला होता. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्यामुळे फक्त १२६० गाड्यांची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५५० वाहनांमधून तब्बल १६४ टन कृषी माल विक्रीसाठी आला होता. नाशिक, पुणे, सातारा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आला होता. भिजल्यामुळे जवळपास १० टन माल फेकून द्यावा लागला. मुंबईमधून किरकोळ विक्रेते माल खरेदी करण्यासाठी आलेच नाहीत. यामुळे तब्बल २५ टक्के मालाची विक्रीच झालेली नाही. मार्केटमध्ये ४० टनपेक्षा जास्त माल दिवसभर पडून होता. बुधवारी कमी दराने या मालाची विक्री करावी लागण्याची शक्यता आहे. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भाजीपाला मार्केटबरोबर धान्य मार्केटमधील व्यवहारावरही परिणाम झाला आहे. सोमवारी मार्केटमध्ये ४१९ वाहनांची आवक झाली होती. मंगळवारी फक्त २०८ वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली आहे. मसाला मार्केटमध्येही ५० टक्के आवक कमी झाली आहे. आवक कमी असूनही ग्राहकच नसल्यामुळे कृषी मालाची विक्री होऊ शकली नाही. बाजारभावामध्ये फरक पडला नसला तरी पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील आठवड्यात भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.पावसामुळे मुंबई व उपनगरांमधून किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी पुरेशा प्रमाणात आले नाहीत. यामुळे २५ टक्के मालाची विक्री होऊ शकली नाही.- शंकर पिंगळे,व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसीकांदा - बटाटा मार्केटमध्येही आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. सोमवारी २५९ वाहनांची आवक झाली होती. मुसळधार पावसामुळे मंगळवारी फक्त १७४ वाहनांमधून कांदा, बटाटा व लसूणची आवक झाली आहे.- सुरेश शिंदे,व्यापारी, कांदा मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती