शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

फेरीवाल्यांनी बळकावला रेल्वेचा पादचारी पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:25 IST

तुर्भेतील प्रकार; आठवड्यापूर्वी झाले उद्घाटन

नवी मुंबई : रेल्वेरूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी तुर्भेत उभारण्यात आलेला पादचारी पूल आठवड्यातच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी बनवलेल्या या पुलावर रविवारचा आठवडे बाजार बसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे हा पूल पादचाºयांच्या की फेरीवाल्यांच्या सोयीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.तुर्भे नाका व जनता मार्केट परिसराला जोडणाºया रेल्वेरुळावरील पादचारी पुलाचे गत आठवड्यात उद्घाटन झाले. त्या ठिकाणी पादचाºयांकडून रूळ ओलांडला जात असल्याने अपघाताच्या घटना घडत होत्या. त्याला आळा घालण्यासाठी पालिकेच्या सुमारे सहा कोटी ८४ लाख रुपये खर्चातून हा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना एका विभागातून दुसºया विभागात जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडून करावा लागणारा मृत्यूच्या दाढेखालील प्रवास टळला आहे. मात्र, हा पूल पादचाºयांसाठी वरदान ठरत असतानाच त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. जनता मार्केट परिसरात प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरत असतो. त्यापैकी काही फेरीवाल्यांनी या नव्या पुलावरच बाजार भरवल्याचे पुलाच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्याच रविवारी पाहायला मिळाले. सदर पुलाच्या उद्घाटनावेळीच त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होण्याची शक्यता पालिका अधिकाºयांनी वर्तवली होती. या नव्या पुलाला जोडून असलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलावरही फेरीवाल्यांनी यापूर्वी कब्जा मिळवला होता. मात्र, त्यांच्यामुळे पादचाºयांना अडचण होऊ लागल्याने नागरिकांकडूनहोणाºया विरोधामुळे ते त्या ठिकाणी फार काळ टिकू शकले नाहीत. या पूर्वानुभवावरून रेल्वेरुळावरील नवा पादचारी पूलही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडणार नाही याची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित सर्वच प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा होताना दिसत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे यांनी केला आहे. परिणामी, पादचाºयांना पुलावरून चालण्यात अडथळा निर्माण होत आहे. तर या फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न झाल्यास त्यांना अर्थपूर्ण राजाश्रय मिळून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :hawkersफेरीवाले