शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मैदानासाठी धावाधाव

By admin | Updated: September 1, 2015 04:49 IST

यंदाचा दहीहंडी व गणेशोत्सव रस्त्याऐवजी मैदानातच साजरा करण्याच्या सूचना पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना केल्या आहेत. त्यामुळे आयोजक मंडळांची जागेसाठी धावपळ सुरू झाली आहे

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई यंदाचा दहीहंडी व गणेशोत्सव रस्त्याऐवजी मैदानातच साजरा करण्याच्या सूचना पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना केल्या आहेत. त्यामुळे आयोजक मंडळांची जागेसाठी धावपळ सुरू झाली आहे. परिणामी मैदान आरक्षणात राजकीय कुरघोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाचा गणेशोत्सव व दहीकाला नागरिकांना विघ्नमुक्त करण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे. रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी होवून इतरही अनेक समस्या उद्भवतात. अनेकदा रुग्णवाहिका देखील अशा उत्सवाच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीमध्ये अडकून रुग्णाच्या उपचारात बाधा येत असते. त्यामुळे यंदा रस्त्यावर मंडप घालून उत्सव करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार काही दिवसांवर येवून ठेपलेली दहीहंडी व गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी तशा सूचनाही केल्या आहेत. रस्ता अडवून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना लगतच्या मैदानाचा पर्याय पोलिसांनी सुचवलेला आहे. त्यानुसार काही मंडळांनी पोलिसांना प्रतिसाद देत रस्त्यावरील मंडप हटवून लगतच्या मैदानात उत्सवाची तयारी सुरू केली आहे.पोलिसांच्या या निर्णयामुळे काही मंडळांना राजकीय कुरघोडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मंडळांचे दहीहंडी अथवा गणेशोत्सव रद्द होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यापैकी निम्याहून अधिक मंडळांचे मंडप प्रतिवर्षी रस्ता अडवून थाटले जातात. शहरातल्या अनेक ठिकाणी एकाच रस्त्यावर थोड्याफार अंतरावर दोन किंवा अधिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र रस्ता अडवून गणेशोत्सव साजरा करण्यावर यंदा पोलिसांनी हरकत घेतल्याने यावेळी त्यांना हे शक्य नाही. रस्त्याऐवजी मैदानात गणेशोत्सव साजरा करण्याच्या सक्त सूचना पोलिसांनी दिल्याने अनेक मंडळांनी नेहमीच्या जागेलगतच्या मैदानांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे विभागात उपलब्ध असलेल्या मैदानावर एक ते पाच मंडळांना आरक्षणासाठी दावा करावा लागणार आहे. बहुतांश ठिकाणी वर्षानुवर्षे उत्सव साजरा करणारी बरीच मंडळे आहेत. मुळात शहरात विभागनिहाय मोकळ्या मैदानांची कमतरता आहे. ठरावीक ठिकाणी एक ते दोनच मैदाने असल्याने ती मिळवण्यासाठी चढाओढ होणार आहे. शहरातल्या प्रत्येक विभागात हीच परिस्थिती असल्याने बहुतांश मंडळांपुढे जागेची समस्या भेडसावणार आहे. दहीहंडी अथवा गणेशोत्सवात राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांच्या स्तुत्य उपक्रमाला खीळ देखील बसवू शकते. उत्सवासाठी मैदान मिळवणाऱ्या मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांना उत्सवासाठी पर्यायी दुसऱ्या जागेचा शोध घेणे अथवा कार्यक्रमच रद्द करणे भाग पडणार आहे. तसे झाल्यास शहरातील सार्वजनिक मंडळांकडून साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची संख्या देखील घटण्याची शक्यता आहे.