शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दंगामुक्त महाराष्ट्रासाठी रायगडावर संकल्प मेळावा

By admin | Updated: September 17, 2016 02:22 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सर्वधर्मसमभाव सतत जागृत राहण्यासाठी आणि दंगामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड आणि दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडच्या

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सर्वधर्मसमभाव सतत जागृत राहण्यासाठी आणि दंगामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड आणि दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी छत्रपतींची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संकल्प मेळाव्याला महाराष्ट्रातून सुमारे ५० हजार मुस्लीम शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवविचारवंत शेख सुभानअल्ली यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. ते एक उत्तम प्रशासक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच होते. त्यामुळे शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात रुजले तर सर्व जाती-धर्मामध्ये परस्पर सामंजस्य व मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होऊ शकतील. जातीय व धार्मिक दंगलीसारखे प्रकार टळून सर्वसामान्य माणसाला सर्वांगीण प्रगती साध्य करण्याची संधी मिळेल, या एकमेव उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन रायगडावर केल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. राज्य आणि देशातील सर्व जातीधर्मीयांना एकमेकांशी सलोख्याने जोडायचे असेल, त्यांच्यात सामंजस्य निर्माण करायचे असेल तर शिवरायांचेच विचार अमलात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सुभानअल्ली यांनी केले आहे. २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याचे निमित्ताने प्रथमच शिवविचारांचे ५० हजार मुस्लीम बांधव किल्ले रायगडावर येत आहेत. जातीधर्मात परस्पर सामंजस्य निर्माण होण्याच्या उद्देशाने २४ सप्टेंबरला रायगडावर ५० हजार शिवभक्त उपस्थित राहणार ही बाब अभिमानास्पद आहे. मुस्लीम समाजबांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत.या मेळाव्याचे परवानगीचे पत्र संयोजकांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. (वार्ताहर)