शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

नवी मुंबईतील सर्व्हिस सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याबाबत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 01:44 IST

अधिकारी सुस्त : जलवाहिन्यांमधून चोरले जाते आहे पाणी 

n  सूर्यकांत वाघमारेn  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात गॅरेज व सर्व्हिस सेंटर चालवले जात आहेत. त्या ठिकाणी वापरले जाणारे पाणी येते कुठून हा संशोधनाचा विषय बनला आहे. बहुतांश सेंटरमध्ये जलवाहिनीच्या चोरीच्या पाण्याचा वापर होत असल्याने सर्वच ठिकाणांची पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात प्रत्येक नोडमध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे सर्व्हिस सेंटर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहने धुण्याचे काम होत आहे. यासाठी शंभर ते दीडशे रुपये शुल्क आकारले जात आहे. यानुसार एका वाहनामागे शेकडो लीटर पाण्याचा वापर होत असल्याने प्रत्येक सेंटरमध्ये दिवसाला लाखो लीटर पाण्याचा वापर होत आहे. त्यांना हे पाणी येतेय कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात चालत असलेले बहुतांश सर्व्हिस सेंटर मोरबेच्या जलवाहिन्यांच्या जळपासच्या परिसरात आहेत. त्यापैकी अनेकांकडून जलवाहिनीचे पाणी चोरले जात असल्याचा दाट संशय आहे. तर नोडमध्ये चालणारे सेंटर चालकांनी जवळपासच्या जलवाहिनीला पाइप जोडून सेंटरपर्यंत पाणी वाहून नेल्याचीही शक्यता आहे. अनेक सेंटरच्या समोर रस्ते खोदून हे नळ जोडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी टाक्या उभारून त्यात टँकरद्वारे पाणी साठवले जात असल्याचेही भासवले जात आहे. मात्र उघडपणे हे सर्व्हिस सेंटर चालवले जात असतानाही प्रशासनाकडून तिथली झाडाझडती का घेतली जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. 

धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजवाहने धुतल्यानंतरचे सांडपाणी हे जवळपासच्या नाल्यात व गटारात सोडले जात आहे. वाहने धुण्यासाठी डिझेलचा वापर होत असल्याने सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात तेलाचे प्रमाण असते. नाल्याद्वारे हेच सांडपाणी नाल्यांमधून खाडीत मिसळत आहे. यामुळेच अनेक ठिकाणी पाण्यावर तेलाचे तवंग दिसून मासे मरत असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस सेंटरच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.