शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

नवी मुंबईतील सर्व्हिस सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याबाबत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 01:44 IST

अधिकारी सुस्त : जलवाहिन्यांमधून चोरले जाते आहे पाणी 

n  सूर्यकांत वाघमारेn  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात गॅरेज व सर्व्हिस सेंटर चालवले जात आहेत. त्या ठिकाणी वापरले जाणारे पाणी येते कुठून हा संशोधनाचा विषय बनला आहे. बहुतांश सेंटरमध्ये जलवाहिनीच्या चोरीच्या पाण्याचा वापर होत असल्याने सर्वच ठिकाणांची पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात प्रत्येक नोडमध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे सर्व्हिस सेंटर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहने धुण्याचे काम होत आहे. यासाठी शंभर ते दीडशे रुपये शुल्क आकारले जात आहे. यानुसार एका वाहनामागे शेकडो लीटर पाण्याचा वापर होत असल्याने प्रत्येक सेंटरमध्ये दिवसाला लाखो लीटर पाण्याचा वापर होत आहे. त्यांना हे पाणी येतेय कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात चालत असलेले बहुतांश सर्व्हिस सेंटर मोरबेच्या जलवाहिन्यांच्या जळपासच्या परिसरात आहेत. त्यापैकी अनेकांकडून जलवाहिनीचे पाणी चोरले जात असल्याचा दाट संशय आहे. तर नोडमध्ये चालणारे सेंटर चालकांनी जवळपासच्या जलवाहिनीला पाइप जोडून सेंटरपर्यंत पाणी वाहून नेल्याचीही शक्यता आहे. अनेक सेंटरच्या समोर रस्ते खोदून हे नळ जोडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी टाक्या उभारून त्यात टँकरद्वारे पाणी साठवले जात असल्याचेही भासवले जात आहे. मात्र उघडपणे हे सर्व्हिस सेंटर चालवले जात असतानाही प्रशासनाकडून तिथली झाडाझडती का घेतली जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. 

धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजवाहने धुतल्यानंतरचे सांडपाणी हे जवळपासच्या नाल्यात व गटारात सोडले जात आहे. वाहने धुण्यासाठी डिझेलचा वापर होत असल्याने सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात तेलाचे प्रमाण असते. नाल्याद्वारे हेच सांडपाणी नाल्यांमधून खाडीत मिसळत आहे. यामुळेच अनेक ठिकाणी पाण्यावर तेलाचे तवंग दिसून मासे मरत असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस सेंटरच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.