शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

भाजी मार्केटचा प्रश्न अखेर मार्गी, एपीएमसीमधील २८५ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 03:03 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २१ कोटी रुपये खर्च करून विस्तारित भाजी मार्केट बांधले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २१ कोटी रुपये खर्च करून विस्तारित भाजी मार्केट बांधले आहे. उद्घाटन करूनही आठ वर्षे मार्केटचा वापर होऊ शकला नाही. व्यापारी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून शासनाकडून वापर बदल करण्याची परवानगी घेऊन २८५ गाळे तयार केले आहेत. बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मार्केट पुन्हा सुरू होईल.मुंबईमधील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये तुर्भेमधील बाजार समितीच्या आवारामध्ये स्थलांतरित करण्यात आले. व्यापाऱ्यांना ९३६ गाळे उपलब्ध करून देण्यात आले. मुंबई व नवी मुंबई परिसरातील सर्व होलसेल व्यापार याच मार्केटमधून सुरू आहे. स्थलांतर झाल्यानंतरही काही व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध झाले नाहीत. याशिवाय मार्केटमध्ये नवीन परवाने घेऊन अनेकांनी बिगरगाळाधारक म्हणून व्यवसाय सुरू केला. बिगरगाळाधारकांची संख्या जवळपास ३०० पर्यंत गेल्यानंतर त्यांच्यासाठी मूळ मार्केटमधील जागा अपुरी पडू लागली.व्यापाराचा प्रश्न सोडविण्यासाठी २००३ मध्ये विस्तारित मार्केट बांधण्याची मागणी व्यापाºयांनी केली. या पाठपुराव्याला यश आले व तत्कालीन संचालक मंडळाने ११२३० चौरस मीटरच्या भूखंडावर नवीन मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला. ३०० चौरस फूट क्षेत्रफळाचे २८५ गाळे तयार करण्याचा निर्णय घेऊन २००५ मध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले. २००७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले व गाळ्यांचे वितरणही करण्यात आले. विविध कारणांनी प्रत्यक्ष व्यापार सुरू होऊ शकला नाही. दोन्ही मार्केटना जोडणारा रस्ता व विविध कारणांनी हे काम रखडत होते. अखेर २ फेब्रुवारी २०११ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मार्केटचे उद्घाटन झाले.मार्केटचे उद्घाटन झाल्यानंतरही या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी फारसे ग्राहक येत नसल्यामुळे मार्केट पुन्हा बंद पडले. जवळपास आठ वर्षांपासून येथील बहुतांश गाळे बंदच ठेवावे लागले होते. काही व्यापाºयांनी निर्यातीसाठीची पॅकिंग व इतर भाजीपाल्याची विक्री सुरू ठेवली; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे गाळ्यांचा अन्य कृषी मालाच्या व्यापारासाठी वापर करता यावा, अशी परवानगी व्यापाºयांनी शासनाकडे मागितली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या विषयी दोन वेळा लक्ष्यवेधी मांडल्यानंतर शासनाने गाळे बंदिस्त करून नियमन नसलेल्या कृषी मालाचा व्यापार करण्यास परवानगी दिली. १४ आॅगस्ट २०१७ ला बांधकाम परवानगी घेऊन गाळे बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. एका वर्षात बांधकाम पूर्ण झाले असून भोगवटा प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने एकत्र येऊन येथे कृषी होलसेल मार्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच प्रत्यक्षात मार्केट सुरू होणार आहे.विस्तारित मार्केटचा प्रवास पुढीलप्रमाणे२००३ - विस्तारित भाजी मार्केटचे बांधकाम करण्याचा एपीएमसीचा निर्णय२००५ - विस्तारित भाजी मार्केटमध्ये २८५ गाळ्यांचे बांधकाम करण्याचे काम सुरू२००८ - मार्केटचे बांधकाम पूर्ण होऊन गाळ्यांचे वितरण२०११ - तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्केटचे उद्घाटनआॅगस्ट २०१८ - मार्केटमध्ये गाळे बंदिस्त करण्याचे काम सुरूआॅगस्ट २०१९ - मार्केटमधील गाळे बंदिस्त करण्याचे काम पूर्णएपीएमसीने बांधकाम केलेल्या मार्केटचा आठ वर्षांपासून योग्य वापर होत नव्हता. व्यापाºयांनी हा प्रश्न निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून वापरामध्ये बदल करण्याचा व गाळ्यांचे बांधकाम करण्यासाठीच्या परवानग्या मिळवून दिल्या. रखडलेला हा प्रश्न मार्गी लावता आला याचे समाधान आहे.- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूरविस्तारित भाजी मार्केटच्या वापरामध्ये बदल करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर एक वर्षापूर्वी गाळे बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मार्केट सुरू करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.- रामदास चासकर,सचिव,कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनमार्केटमध्ये नियमन नसलेल्या कृषी मालाचा व्यापार करण्याची परवानगी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले होते. बाजार समिती प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण व बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने वापर बदल करण्यास मंजुरी दिली. बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मार्केट पुन्हा सुरू होईल.- राहुल पवार,कायदेविषयी सल्लागार,व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई