शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 01:19 IST

ठाणे - बेलापूर रोडवर दिघा येथे अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम आठ वर्षांपासून रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्काळ अतिक्रमण हटवून रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर रोडवर दिघा येथे अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम आठ वर्षांपासून रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्काळ अतिक्रमण हटवून रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या कडक भूमिकेमुळे स्थानिकांनी स्वत:च अतिक्रमण हटविले आहे. आठ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आठ दिवसांमध्ये सोडविल्यामुळे शहरवासीयांनी मुंढे यांचे आभार मानले आहेत. तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हातामध्ये घेतल्यापासून कामांचा झपाटा सुरू केला आहे. आतापर्यंत सर्वात दुर्लक्षित राहिलेल्या दिघा विभागापासून समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. दिघा विभागा कार्यालयास भेट दिल्यानंतर कामात हलगर्जी केलेल्या एक कर्मचाऱ्याला निलंबित केल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागेल व इतर तांत्रिक अडचणी सांगितल्यानंतर आठ दिवसामध्ये रस्ता मोकळा झाला पाहिजे असे स्पष्ट केले. आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनाने १६ मे रोजी येथील ४२ अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी कारवाई केली जाणार होती. परंतु आयुक्तांच्या भूमिकेमुळे हादरलेल्या रहिवाशांनी व दुकानमालकांनी शुक्रवारी स्वत:च जेसीबी लावून येथील अतिक्रमणे हटविली आहेत. पालिका १६ मे रोजी अतिक्रमण हटविणार होते. परंतु स्थानिकांनी १३ मे रोजी स्वत:च अतिक्रमण काढल्यामुळे आता रुंदीकरणाचे प्रश्न मार्गी लागला आहे. मुंढे यांच्या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. विकासकामांचा धडाका असाच सुरू राहावा अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.1सायन - पनवेल महामार्गानंतर सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या रोडमध्ये ठाणे - बेलापूर रोडचा समावेश होतो. पूर्वी विटावा ते महापे जंक्शनपर्यंतचा रस्ता औद्योगिक वसाहत व महापे जंक्शन ते तुर्भेपर्यंतचा रस्ता सिडकोच्या अखत्यारीत होता. 2दोन यंत्रणांमध्ये विभागल्यामुळे रोडवरील खड्डे बुजविण्याचे कामही केले जात नव्हते. २००५ मध्ये १५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी दोन ते तीन तास वाहतूक कोंडीमध्ये रखडावे लागत होते. 3नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने स्वखर्चाने हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी केंद्र शासनाच्या एएसआयडीई योजनेमधूनही निधी प्राप्त झाला होता.