शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरोग्य विभागातील कर्मचारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:22 IST

नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून बगल; राखीव आरक्षणाची मागणी

नवी मुंबई : पालिकेकडून आरोग्य विभागासाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिकांना डावलून वशिल्याची भरती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून होत असलेल्या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पालिकेच्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या जागा भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून आजवर ठोस प्रयत्न झालेले नाहीत. परंतु कोरोनामुळे आरोग्य विभागातले मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पालिकेकडून कंत्राटी स्वरूपात डॉक्टर, परिचारिका व इतर सहायक कर्मचारी भरती सु्न३ करण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे ५०० जणांना पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी मिळणार आहे. परंतु पालिकेत कंत्राटी स्वरूपात भरती झालेल्यांना कायम कामगारांप्रमाणेच वेतन व सुविधा दिल्या जातात. त्यामुळे आरोग्य विभागासाठी होत असलेली भरती प्रक्रिया शासकीय नोकर भरतीच ठरत आहे. असे असतानाही प्रशासनाकडून सदर भरती प्रक्रियेसाठी शासनाचे नियम डावलून आरक्षण वगळले आहे.रिक्त पदांनुसार प्रत्येक प्रवर्गाला राखीव जागा देणे आवश्यक आहे. असे झाल्यास गरजवंतांना नोकरीची संधी मिळू शकते. परंतु कंत्राटी भरतीच्या नावाखाली प्रशासनाकडून या बाबींना बगल देण्यात आली आहे.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी सदर भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करून नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.सत्ताधारी, विरोधकांचे मौनपालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटी कायमस्वरूपी भरती प्रक्रियेला लागू होणार आहेत. त्यामुळे पूर्वनियोजित पद्धतीने आरक्षण डावलून वशिल्याच्या भरतीसाठी खटाटोप सुरू असल्याचीही शक्यता अभयचंद्र सावंत यांनी वर्तवली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होत असतानाही सत्ताधारी व विरोधक यांच्या मौनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका