शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नवी मुंबईकरांना काळ्या पिवळ्या पाण्याची शिक्षा

By नामदेव मोरे | Updated: December 20, 2023 19:57 IST

दूषीत पाण्यामुळे नागरिक त्रस्त :   नागरिकांचे आरोग्य बिघडले

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नेरूळमधील सारसोळे परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. नळातून काळे, पिवळे पाणी येत असून रहिवासी त्रस्त झाले आहेत. दूषीत पाण्यामुळे आरोग्य बिघडू लागले असून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. नळातून गढूळ पाणी येवू लागले आहे. घणसोलीपासून नेरूळपर्यंत कमी अधिक फरकाने ही समस्या सुरू झाली आहे. सारसोळे सेक्टर ६ मध्ये सर्वाधीक गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी येवू लागल्या आहेत. अनेक सोसायटीमध्ये नळातून पिवळे, काळे पाणी येत असून हे पाणी वापरण्यायोग्य नसल्यामुळे पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुषीत पाणी प्यायल्यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडू लागले आहे.

माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी याविषयी पाणीपुरवठा विभाग व आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परिसरातील व्हॉल्व बदलला असल्यामुळे काही ठिकाणी गढूळ पाणी येत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात दूषीत पाण्याची समस्या गंभीर असून त्याची कारणे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घरातील दूषित पाण्याचे फोटोही नागरिकांनी अधिकाऱ्यांना पाठविले आहेत.

सारसोळे परिसरामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना करावी यासाठी आयुक्तांना पत्र पाठविले आहे.- सुरज पाटील, माजी नगरसेवक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई