शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नवी मुंबईकरांना काळ्या पिवळ्या पाण्याची शिक्षा

By नामदेव मोरे | Updated: December 20, 2023 19:57 IST

दूषीत पाण्यामुळे नागरिक त्रस्त :   नागरिकांचे आरोग्य बिघडले

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नेरूळमधील सारसोळे परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. नळातून काळे, पिवळे पाणी येत असून रहिवासी त्रस्त झाले आहेत. दूषीत पाण्यामुळे आरोग्य बिघडू लागले असून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. नळातून गढूळ पाणी येवू लागले आहे. घणसोलीपासून नेरूळपर्यंत कमी अधिक फरकाने ही समस्या सुरू झाली आहे. सारसोळे सेक्टर ६ मध्ये सर्वाधीक गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी येवू लागल्या आहेत. अनेक सोसायटीमध्ये नळातून पिवळे, काळे पाणी येत असून हे पाणी वापरण्यायोग्य नसल्यामुळे पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुषीत पाणी प्यायल्यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडू लागले आहे.

माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी याविषयी पाणीपुरवठा विभाग व आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परिसरातील व्हॉल्व बदलला असल्यामुळे काही ठिकाणी गढूळ पाणी येत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात दूषीत पाण्याची समस्या गंभीर असून त्याची कारणे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घरातील दूषित पाण्याचे फोटोही नागरिकांनी अधिकाऱ्यांना पाठविले आहेत.

सारसोळे परिसरामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना करावी यासाठी आयुक्तांना पत्र पाठविले आहे.- सुरज पाटील, माजी नगरसेवक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई