शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मानवी तस्करीविषयी बाइक राइड रॅलीद्वारे जनजागृती, देश-विदेशातील रायडर्सचा सहभाग 

By नामदेव मोरे | Updated: November 3, 2023 19:41 IST

शुक्रवारी ही यात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून शनिवारी मुंबईमध्ये याचा समारोप होणार आहे. 

नवी मुंबई : मानवी तस्करीविषयी जनजागृती करण्यासाठी ओॲसिस इंडिया सामाजिक संस्थेने मुक्ती बाइक चॅलेंज यात्रेचे आयोजन केले होते. मंगळुरू ते मुंबई असा दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी ही यात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून शनिवारी मुंबईमध्ये याचा समारोप होणार आहे. 

देशामध्ये मानवी तस्करीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. प्रत्येक आठ मिनिटांमध्ये एक मुलगा किंवा मुलगी हरवते. यापैकी अनेकांचा पत्ता लागत नाही. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ओॲसिस इंडियाच्या माध्यमातून २०१७ पासून ही जनजागृती केली जात आहे.यावर्षीही मुक्ती बाइक चॅलेंज यात्रेत चार भारतीय व ४ विदेशी असे ८ रायडर्स सहभागी झाले होते. २८ ऑक्टोबरला बंगळुरू येथून सुरुवात झाली. हसन, मंगलोर, उड्डपी, कुमटा, बेळगाव, मीरज पुणे असा प्रवास करून शुक्रवारी नवी मुंबईमध्ये दाखल झाली. शनिवारी वायएमसीए इंटरनॅशनल हाउस येथे याचा समारोप होणार आहे.

या यात्रेदरम्यान शाळा, महाविद्यालये व इतर ठिकाणी पथनाट्य व इतर मार्गाने मानवी तस्करी रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, काय खबरदारी घ्यावी, महिला, मुलांचे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. या यात्रेच्या माध्यमातून संकलित झालेला निधी अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना सक्षम करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहितीही विश्वास उदगीर यांनी दिली.

मानवी तस्करीविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करता आली याचे समाधान आहे.- रिटा गटब्रलेत, जर्मनी

आतापर्यंत सलग पाच वेळा मुक्ती बाइक चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.- विजय अंपय्या 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई