शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी आंदोलकांचा २४ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:12 IST

मुंबईत जाण्यास पोलिसांची मनाई : सानपाडा परिसराला छावणीचे स्वरूप; आंदोलकांनीही दाखविला संयम

नवी मुंबई : आरक्षणासाठी धनगर समाजाने काढलेला मोर्चा पोलिसांनी नवी मुंबईमध्ये अडविला. कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबईमध्ये जाण्यास मनाई केली. यामुळे २४ तास आंदोलकांनी नवी मुंबईमध्ये ठिय्या मांडला होता. कडक बंदोबस्तामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मागण्यांवर ठाम असलेल्या आंदोलकांनीही दिवसभर संयमाचे दर्शन घडविले व शासनाने मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

महाडमधील चवदार तळे येथून धनगर आरक्षणासाठीचा लढा बुधवारी सुरू करण्यात आला. सुरुवातीपासूनच पोलिसांनी आंदोलकांना अटकाव करण्यास सुरुवात केली होती. महाडमध्ये प्रमुख नेत्यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर सायंकाळी पनवेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आंदोलकांना अडविण्यात आले. नेत्यांना व प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांनी रास्ता रोखो केल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले. बुधवारी सायंकाळी आंदोलक सानपाडामधील दत्तमंदिर परिसरामध्ये मुक्कामाला थांबले. गुरुवारी सकाळीच पोलिसांनी या परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर देशभर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, यामुळे आंदोलकांना मुंबईत जाण्यास पोलिसांनी मनाई केली होती. आंदोलनाचे नेते गोपीनाथ पडळकर व उत्तमराव जानकर यांनी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सकाळी केला.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले. दिवसभर राज्यभरातून नागरिक आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी नवी मुंबईमध्ये येत होते. कोणत्याही स्थितीमध्ये आरक्षण मिळाल्याचा दाखला मिळेपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्धार केला. यामुळे दिवसभर परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.

परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह मुंबईमधील पोलीस अधिकारी व कर्मचारीही बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले होते. आंदोलकांना मुंबईत जाण्यापासून थांबविण्यात आले. यासाठी नेत्यांची व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना देशातील स्थितीची माहिती देण्यात आली. आंदोलक मागण्यांवर ठाम असले, तरी त्यांनी दिवसभर संयमी भूमिका घेऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची दक्षता घेतली. तब्बल २४ तास आंदोलकांनी नवी मुंबईमध्ये ठिय्या मांडला होता. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शासनाने मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलकांनी पाळली शिस्तआरक्षणासाठी आक्रमक असलेल्या आंदोलकांनी दिवसभर मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, याविषयी घोषणा केल्या. आक्रमक भूमिका घेतली असली तरी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली. मंदिर परिसरामध्ये कचरा होणार नाही. आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात होती.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण