शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

धनगर आरक्षणासाठी आंदोलकांचा २४ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:12 IST

मुंबईत जाण्यास पोलिसांची मनाई : सानपाडा परिसराला छावणीचे स्वरूप; आंदोलकांनीही दाखविला संयम

नवी मुंबई : आरक्षणासाठी धनगर समाजाने काढलेला मोर्चा पोलिसांनी नवी मुंबईमध्ये अडविला. कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबईमध्ये जाण्यास मनाई केली. यामुळे २४ तास आंदोलकांनी नवी मुंबईमध्ये ठिय्या मांडला होता. कडक बंदोबस्तामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मागण्यांवर ठाम असलेल्या आंदोलकांनीही दिवसभर संयमाचे दर्शन घडविले व शासनाने मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

महाडमधील चवदार तळे येथून धनगर आरक्षणासाठीचा लढा बुधवारी सुरू करण्यात आला. सुरुवातीपासूनच पोलिसांनी आंदोलकांना अटकाव करण्यास सुरुवात केली होती. महाडमध्ये प्रमुख नेत्यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर सायंकाळी पनवेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आंदोलकांना अडविण्यात आले. नेत्यांना व प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांनी रास्ता रोखो केल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले. बुधवारी सायंकाळी आंदोलक सानपाडामधील दत्तमंदिर परिसरामध्ये मुक्कामाला थांबले. गुरुवारी सकाळीच पोलिसांनी या परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर देशभर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, यामुळे आंदोलकांना मुंबईत जाण्यास पोलिसांनी मनाई केली होती. आंदोलनाचे नेते गोपीनाथ पडळकर व उत्तमराव जानकर यांनी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सकाळी केला.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले. दिवसभर राज्यभरातून नागरिक आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी नवी मुंबईमध्ये येत होते. कोणत्याही स्थितीमध्ये आरक्षण मिळाल्याचा दाखला मिळेपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्धार केला. यामुळे दिवसभर परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.

परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह मुंबईमधील पोलीस अधिकारी व कर्मचारीही बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले होते. आंदोलकांना मुंबईत जाण्यापासून थांबविण्यात आले. यासाठी नेत्यांची व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना देशातील स्थितीची माहिती देण्यात आली. आंदोलक मागण्यांवर ठाम असले, तरी त्यांनी दिवसभर संयमी भूमिका घेऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची दक्षता घेतली. तब्बल २४ तास आंदोलकांनी नवी मुंबईमध्ये ठिय्या मांडला होता. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शासनाने मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलकांनी पाळली शिस्तआरक्षणासाठी आक्रमक असलेल्या आंदोलकांनी दिवसभर मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, याविषयी घोषणा केल्या. आक्रमक भूमिका घेतली असली तरी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली. मंदिर परिसरामध्ये कचरा होणार नाही. आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात होती.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण