शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

नवी मुंबईत मालमत्ता कराची दोन हजार कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:45 IST

शहरातील थकीत मालमत्ता कराचा प्रश्न सोडविण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कराचा प्रश्न सोडविण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर्वसाधारण सभेने याविषयी प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या कराचा प्रश्न सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा मोठा वाटा आहे. पुढील वर्षासाठी अर्थसंकल्पात ६८५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट या विभागाला देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये निवासी व अनिवासी कराची थकबाकी तब्बल दोन हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. महापालिकेने कारवाई करून व नोटीस पाठवूनही अनेकांकडून थकबाकी भरली जात नाही. महापालिका प्रशासनाने थकबाकीवर लावलेला दंड, चक्रवाढ पद्धतीचे व्याज यामुळे थकबाकी भरणे अनेकांना शक्य होत नाही. यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याची मागणी सामाजिक संस्था, एमआयडीसीमधील औद्योगिक संस्था व लोकप्रतिनिधींकडून केली जात होती.

महापालिका प्रशासनानेही थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अभय योजनेचा प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी सुचविलेल्या सूचनांनतर या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. योजना लागू केल्यानंतर थकबाकीची रक्कम भरल्यानंतर दंडाच्या रकमेमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. या अभय योजनेमध्ये निवासी व अनिवासी मालमत्तांना लाभ मिळणार आहे. योजनेमधून केंद्र शासन, राज्य शासन व निमशासकीय संस्थांना सूट दिली जाऊ नये, अशी सूचना नगरसेवकांनी मांडली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी यापूर्वी काही प्रलंबित अपिल किंवा न्यायालयात याचिका दाखल केली असल्यास ती मागे घ्यावी लागणार आहे. या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर पुन्हा अपिल किंवा रीट याचिका दाखल केल्यास अभय योजनेची सवलत काढली जाणार आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सद्यस्थितीमध्ये दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची संख्या ७५६४ एवढी आहे. या सर्वांकडे तब्बल १०८४ कोटी ५८ लाख रुपये थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी अनिवासी मालमत्ताधारकांकडे असून, तो आकडा तब्बल ६७९ कोटी रुपये आहे. महापालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.