शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नवी मुंबईत मालमत्ता कराची दोन हजार कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:45 IST

शहरातील थकीत मालमत्ता कराचा प्रश्न सोडविण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कराचा प्रश्न सोडविण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर्वसाधारण सभेने याविषयी प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या कराचा प्रश्न सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा मोठा वाटा आहे. पुढील वर्षासाठी अर्थसंकल्पात ६८५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट या विभागाला देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये निवासी व अनिवासी कराची थकबाकी तब्बल दोन हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. महापालिकेने कारवाई करून व नोटीस पाठवूनही अनेकांकडून थकबाकी भरली जात नाही. महापालिका प्रशासनाने थकबाकीवर लावलेला दंड, चक्रवाढ पद्धतीचे व्याज यामुळे थकबाकी भरणे अनेकांना शक्य होत नाही. यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी अभय योजना जाहीर करण्याची मागणी सामाजिक संस्था, एमआयडीसीमधील औद्योगिक संस्था व लोकप्रतिनिधींकडून केली जात होती.

महापालिका प्रशासनानेही थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अभय योजनेचा प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी सुचविलेल्या सूचनांनतर या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. योजना लागू केल्यानंतर थकबाकीची रक्कम भरल्यानंतर दंडाच्या रकमेमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. या अभय योजनेमध्ये निवासी व अनिवासी मालमत्तांना लाभ मिळणार आहे. योजनेमधून केंद्र शासन, राज्य शासन व निमशासकीय संस्थांना सूट दिली जाऊ नये, अशी सूचना नगरसेवकांनी मांडली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी यापूर्वी काही प्रलंबित अपिल किंवा न्यायालयात याचिका दाखल केली असल्यास ती मागे घ्यावी लागणार आहे. या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर पुन्हा अपिल किंवा रीट याचिका दाखल केल्यास अभय योजनेची सवलत काढली जाणार आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सद्यस्थितीमध्ये दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची संख्या ७५६४ एवढी आहे. या सर्वांकडे तब्बल १०८४ कोटी ५८ लाख रुपये थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी अनिवासी मालमत्ताधारकांकडे असून, तो आकडा तब्बल ६७९ कोटी रुपये आहे. महापालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.