शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राइकचे कसले पुरावे मागता?

By admin | Updated: January 10, 2017 06:17 IST

सर्जिकल स्ट्राईकनंतरही आपल्या देशात काही लोक पुरावे कसे मागतात, असा प्रश्न कारगिल युद्धातील महावीरचक्र विजेते दिगेंद्रकुमार यांनी विचारला

ठाणे : सर्जिकल स्ट्राईकनंतरही आपल्या देशात काही लोक पुरावे कसे मागतात, असा प्रश्न कारगिल युद्धातील महावीरचक्र विजेते दिगेंद्रकुमार यांनी विचारला. आपल्या देशात काही लोकांना ‘भारतमाता की जय’ म्हणायची लाज वाटते, अशी नाराजी व्यक्त करत यापुढे ‘जय हिंद’ म्हणा आणि इतरांनाही म्हणायला भाग पाडा, असे आवाहन त्यांनी केले. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिल्या व़्याख्यानात ते बोलत होते. १७ वर्षांपर्वी झालेल्या कारगील लढाईची शौर्यगाथा त्यांनी उलगडली. क्रिकेटरने चांगली कामगिरी केली, तर त्यांच्यावर कोट्यवधींची उधळण होते. मात्र, सैनिकांनी कितीही चांगली कामगिरी केली, दहशतवाद्यांचा खातमा केला, तरी त्यांचे कौतुकही होत नाही आणि आर्थिक मोबदलाही पुरेसा मिळत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. क्रिकेटरने सहा सिक्सर मारले की त्याला सहा कोटी रूपये दिले जातात. परंतु सैनिकाने सहा दहशतवादी मारल्यावर त्याला सहा हजार रुपयेदेखील मिळत नाहीत, ही नाराजी त्यांनी उदाहरणासह पटवून दिली. कारगील युद्धात जखमी झाल्यावर श्रीनगरच्या रुग्णालयात मला दाखल करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी ‘तू वीरपूत्र आहेस, कलियुगातला भीम आहेस,’ अशा शब्दांत कौतुक केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी मला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले आणि या महाराष्ट्राच्या धरतीने मला पुनर्जन्म दिला. मी तिचा कायमच ऋणी आहे. तेथील रुग्णालयात माझ्यावर सहा महिने उपचार सुरू होते. १४ आॅगस्टला जनरल मलिक मिठाई घेऊन मला भेटायला आले, तेव्हा त्यांनी मला महावीरचक्र जाहीर झाल्याचे सांगितले. २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनात ते प्रदान करण्यात आले. तेव्हापासून देश माझ्या पराक्रमाचे कौतुक करीत आहे. जिवंतपणी महावीरचक्र मिळालेला मी पहिला सैनिक आहे, हे सांगत त्यांनी आयुष्य आनंदाने जगण्याचा सल्ला दिला. ‘दंगल’ चित्रपटात दाखविण्यात आलेली घटना सत्य आहे. हरियाना, राजस्थानमध्ये मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांना कुस्तीच्या ‘दंगली’त पाठविले जात नाही. परंतु महावीर फोगाट यांनी आपल्या मुलींना आॅलिम्पिकपर्यंत पोचविले. नोटाबंदीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. १९९३ साली ज्यावेळी आम्ही दहशतवादी मारले, तेव्हा त्यांच्याकडे सहा लाख रुपये मिळाले आणि त्या भारतीय चलनातल्या नोटा होत्या. त्यावेळी मी पंतप्रधानांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले. त्यामुळे देशात नोटबंदीचा घेण्यात आलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाही, तर त्यांच्या कामाचे मी कौतुक करीत आहे, असे सांगताना त्यांनी मी कोणत्याही पक्षाचा नाही; तर या भारतमातेचा पुत्र आहे. अन्य देशात सैनिक दिसला, की त्याला उभे राहून सलाम करतात. परंतु सैनिकाला ‘जय हिंद’सुद्धा म्हणत नाहीत. आपल्या देशात वीरांची कमतरता नाही. देशाभिमान जागविण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)