शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गावठाण विस्ताराच्या मुद्द्यावर प्रकल्पग्रस्त आक्रमक; ५० वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:43 IST

नवी मुंबई : राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादन प्रक्रियेतून मूळ गावठाणातील जमिनी वगळण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते; परंतु मागील ५० वर्षांत गावठाणांचा विस्तार करण्यात आला नाही, त्यामुळे गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार विकसित ...

नवी मुंबई : राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादन प्रक्रियेतून मूळ गावठाणातील जमिनी वगळण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते; परंतु मागील ५० वर्षांत गावठाणांचा विस्तार करण्यात आला नाही, त्यामुळे गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार विकसित झालेली बांधकामे गावठाण विस्तार योजनेखाली आरक्षित करून त्यांचा मूळ गावठाणात समावेश करावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. प्रकाशझोत सामाजिक संस्थेने या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.सरकारने नवी मुंबईतील २६ गावांच्या जमिनी संपादित केल्या. मूळ गावठाणाबाहेरील बहुतांशी शेतजमिनी संपादित झाल्याने येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. दरम्यान, मागील ५० वर्षांत प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली, लोकसंख्येत नैसर्गिक वाढ झाली, त्यामुळे अनेकांनी मूळ गावठाणाच्या बाहेरील सिडकोने संपादित केलेल्या; परंतु मूळ मालकी असलेल्या जागांवर बांधकामे उभारली. त्यामुळे काही प्रमाणात या प्रकल्पग्रस्तांच्या निवासाचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. असे असले तरी मूळ गावठाणाबाहेर गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे सावट निर्माण झाले आहे. ही बांधकामे नियमित करण्यासाठी गावठाण विस्तार करणे हा एकमेव कायदेशीर पर्याय असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणाबाहेर गरजेपोटी बांधलेली बांधकामे विस्तारित गावठाणाचे सीमांकन करून मूळ गावठाणात अंतर्भूत करणे गरजेचे असून, यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रकाशझोत संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई