शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गावठाण विस्ताराच्या मुद्द्यावर प्रकल्पग्रस्त आक्रमक; ५० वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:43 IST

नवी मुंबई : राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादन प्रक्रियेतून मूळ गावठाणातील जमिनी वगळण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते; परंतु मागील ५० वर्षांत गावठाणांचा विस्तार करण्यात आला नाही, त्यामुळे गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार विकसित ...

नवी मुंबई : राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादन प्रक्रियेतून मूळ गावठाणातील जमिनी वगळण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते; परंतु मागील ५० वर्षांत गावठाणांचा विस्तार करण्यात आला नाही, त्यामुळे गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार विकसित झालेली बांधकामे गावठाण विस्तार योजनेखाली आरक्षित करून त्यांचा मूळ गावठाणात समावेश करावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. प्रकाशझोत सामाजिक संस्थेने या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.सरकारने नवी मुंबईतील २६ गावांच्या जमिनी संपादित केल्या. मूळ गावठाणाबाहेरील बहुतांशी शेतजमिनी संपादित झाल्याने येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. दरम्यान, मागील ५० वर्षांत प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली, लोकसंख्येत नैसर्गिक वाढ झाली, त्यामुळे अनेकांनी मूळ गावठाणाच्या बाहेरील सिडकोने संपादित केलेल्या; परंतु मूळ मालकी असलेल्या जागांवर बांधकामे उभारली. त्यामुळे काही प्रमाणात या प्रकल्पग्रस्तांच्या निवासाचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. असे असले तरी मूळ गावठाणाबाहेर गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे सावट निर्माण झाले आहे. ही बांधकामे नियमित करण्यासाठी गावठाण विस्तार करणे हा एकमेव कायदेशीर पर्याय असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणाबाहेर गरजेपोटी बांधलेली बांधकामे विस्तारित गावठाणाचे सीमांकन करून मूळ गावठाणात अंतर्भूत करणे गरजेचे असून, यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रकाशझोत संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई