शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आयुक्तांच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By admin | Updated: July 16, 2016 02:07 IST

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आयुक्त व अतिक्रमणविरोधी कारवाईच्या निषेधार्थ १८ जुलैला नवी मुंबई बंद करण्याचा इशारा दिला आहे. तुर्भेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. यानंतरही कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या घरी बैठकीचे आयोजन केले होते. यानंतर सायंकाळी सानपाडा दत्तमंदिरमध्ये निषेध सभा घेण्यात आली. या सभेला शहरातील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते. मंदा म्हात्रे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरील कारवाई थांबवा या मागणीसाठी आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो होतो. गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई न करण्याचे आवाहन त्यांना केले. परंतु त्यांनी कारवाई होणारच अशी ठाम भूमिका घेतली. या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी नवी मुंबई बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरील कारवाईचा तीव्र निषेध केला. अतिक्रमण विभागाच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, एकही घर पाडू दिले जाणार नाही, यासाठी केसेस अंगावर घेण्यासही तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने आयुक्तांना समजावून सांगितले परंतु ते मानत नसल्याने आता आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनीही आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी व घरांसाठी रोडवर उतरण्यास तयार आहोत. मुंढे यांची मनमानी चालू दिली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी सर्वांनी एकत्र येवून आंदोलन करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करून पालिकेच्या कारवाईचा निषेध केला.