शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रकल्पग्रस्तांची चळवळ

By admin | Updated: November 26, 2015 01:33 IST

सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला.

कमलाकर कांबळे, नवी मुंबई सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला. परंतु ज्यांच्या त्यागामुळे सिडकोने हा डोलारा उभारला, ते प्रकल्पग्रस्तच दुर्लक्षित राहिले. शहराचा विकास करताना येथील गावांचा विकास खुंटला. असे असले तरी प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीने विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी स्मार्ट व्हिलेजची संकल्पना तयार करण्यात आली आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या नवी मुंबईची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी संकल्पनेच्या प्रसारासाठी केंद्र शासनाकडून महापालिकेला दोन कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्याद्वारे महापालिकेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीविषयी जनजागृती अभियान सुरू केले आहे. मात्र येथील मूळ गावांचा विकास झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची संकल्पना अस्तित्वात येणार नाही, मात्र विकासाअभावी बकाल झालेल्या येथील मूळ गावांचा स्मार्ट सिटी अभियानाला अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवापिढीने येथील गावेच स्मार्ट करण्याचा निर्धार केला आहे. आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांची सुशिक्षित पिढी पुढे सरसावली आहे. सकारात्मक भूमिकेतून मागील सहा महिन्यांपासून हे प्रकल्पग्रस्त तरूण कामाला लागले आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील २८ गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या तरूणाईने कंबर कसली आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांचे प्रबोधन केले जात आहे. स्मार्ट व्हिलेज म्हणजे काय याविषयी माहिती देण्यासाठी फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. विशेष म्हणजे स्मार्ट व्हिलेजची संकल्पना विषद करण्यासाठी दीड तासाचे डॉक्युमेंटेशन तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विविध स्तरावर त्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. त्याला ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या या तरूण पिढीचा उत्साह दुणावला आहे.शहरी भागात आलिशान इमारती, प्रशस्त रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय सुविधा आदींची नियोजनबध्द पध्दतीने आखणी केली. परंतु उपनगराचा विकास करताना येथे असलेल्या मूळ गावांकडे मात्र सिडकोचे दुर्लक्ष झाले. सिडकोच्या नियोजनात राहून गेलेली समतोल विकासातील ही त्रुटी जागतिक स्तरावर नोंद झालेल्या या शहराच्या लौकिकास बाधा निर्माण करणारी ठरली आहे. शहराचा विकास करताना येथील मूळ गावेही विकासाच्या टप्प्यात येणे गरजेचे होते. मात्र सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या गावांची अवस्था झोपडपट्ट्यांपेक्षाही भयानक झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली. मुलांची, नातवंडांची लग्ने झाली. या विस्तारित कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकामे उभारली. या अनियंत्रित बांधकामांमुळे गावे बकाल झाली आहेत. जुन्या कौलारू घरांची जागा ओबडधोबड इमारतींनी घेतली आहे. ग्रामस्थांना प्रलोभने दाखवून भूमाफियांनी गावातील मोकळ्या जागा बळकावल्या. त्यावर बेकायदा चाळी आणि टोलेजंग इमारती उभारल्या. त्यामुळे गावांतील प्रशस्त रस्त्यांचे पायवाटेत रूपांतर झाले आहे. वीस वर्षांपूर्वी ज्या घरांच्या दारापर्यंत चारचाकी वाहने जायची आता तेथपर्यंत रिक्षा नेणेही अवघड होवून बसले आहे. नाले आणि गटारांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने सांडपाणी वाहून नेण्याची जबाबदारी उरल्यासुरल्या रस्त्यांवर येवून ठेपली आहे. एकूणच या गावांतील प्राथमिक सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतकार्य पोहचविताना कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवा ब्रिगेडने उचललेले हे पाऊल भावी पिढीसाठी आशादायक ठरणारे आहे.