शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

प्रगतशील शेतकऱ्यांना संधी देणे आवश्यक

By admin | Updated: July 2, 2017 06:15 IST

जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. त्याचा विकास होण्याकरिता त्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रायगड जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांचा

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. त्याचा विकास होण्याकरिता त्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रायगड जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांचा हा सत्कार सोहळा ठेवला आहे. जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या प्रगतशील शेतकऱ्यांचा आदर्श कायम राहिला पाहिजे. कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मेळावे, शिबिर भरविले जातात. या कार्यक्रमांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांना संधी देण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केले.हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधून जि. प.च्या ना. ना. पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अदिती तटकरे बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रेय पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रिया वेटकोळी, उपसभापती प्रकाश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा कृषी अधीक्षक काशीनाथ तरकसे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, रवींद्र पाटील, बाजीराव परदेशी, गटविकास अधिकारी सुनील प्रधान आदी मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्व सत्कारमूर्ती शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील म्हणाले, जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून प्रत्येकाने झाडे वाढविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेमार्फत टूरिस्ट रिसॉर्ट करण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या पर्यटकांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.अलिबाग, पेण, पोलादपूर येथे कृषी उत्पादन विक्री केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ देणे शक्य होऊ शकेल. कृषी विभागासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी अखेरीस सांगितले.कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील जोमा दरवडा, पांडुरंग पारधी, प्रभाकर सखाराम पाटील, संतोष मांढरे, रामकृष्ण ठाकूर, सुनील ठाकूर, मोहन राणे, दत्तात्रेय पाटील, नामदेव बैलमारे, हरिश्चंद्र गरु डे, भगवान बेलोसे, नाथा हंबीर, जनार्दन वेटकोळी, बाळाराम निरगुडा, राधिका पाटील, विनोद दिवेकर, धर्माजी हिरवे, गोविंद वाघमारे, सुरेश वाघमारे, नथुराम भोईर, विजय वाघमारे, नारायण गोरेगावकर, मंगेश काप, नथुराम चोरगे, धनंजय सावंत, सहदेव खामकर, बबन खेडेकर, परेश पोलेकर, नारायण काते, किशोर फाळके, रामचंद्र कदम, सुधीर यादव, संदीप गोंधळी, गोविंद पाटील, कमळाकर कुऱ्हाडे, गणपत खारपाटील, लक्ष्मण पवार, जयपाल पाटील या प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. अलिबागमधील गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी सुनील प्रधान, उरण येथील विस्तार अधिकारी प्रतिमा गोरे, माणगावमधील विस्तार अधिकारी रणजित लवटे, पोलादपूर येथील कृषी अधिकारी संभाजी भोइटे, पेणचे कृषी अधिकारी मच्छींद्रनाथ भालेराव चार गुणवंत कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, कृषी सभापती दत्तात्रेय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांच्या हस्ते सर्व गुणवंताचा सत्कार करण्यात आला.