शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीसह उद्योगांना गती- केंद्रीय खाद्य उद्योगमंत्र्यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:37 IST

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत.

नवी मुंबई : भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत. यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेती आणि त्यावर आधारित सर्व उद्योगांचा विकास झाला आहे. तंत्रज्ञानामुळे भारतातील सर्वच क्षेत्रातील उद्योग आणि व्यवसायाला गती मिळत असून, भारताच्या दृष्टीने क्र ांतिकारी बदल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय खाद्य प्रसंस्कारण उद्योगमंत्री हरिसमरत कौर बादल यांनी केले. १९ व्या जागतिक फूड परिषदेचा उद्घाटन सोहळा बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात पार पडला, त्या वेळी त्या बोलत होत्या.भारताची लोकसंख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट असतानाही आपल्या देशातील सर्व लोकांची अन्नाची गरज भागविण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सांगत, दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्र मांक लागत असून फळे, भाज्या, मांस, मासे उत्पादनात भारताचा दुसरा क्र मांक लागत आल्याचे मंत्री हरिसमरत कौर बादल यांनी सांगितले. भारताच्या शेतकºयांची अन्नधान्य उत्पादनाची खूप मोठी क्षमता आहे; परंतु देशातील अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नसून, हे दुर्भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.अन्नधान्य साठविण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, वाहतूक अशा अनेक गोष्टींची असलेली कमतरता यामुळेच अन्नाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देशांकडून असे तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला तर अन्नाचा अपव्यय होणार नाही आणि भारत देश अन्नधान्याची फॅक्ट्री म्हणून नावारूपाला येईल, असे त्या म्हणाल्या. या उद्घाटन समारंभाला आययूओपीएसटीचे अध्यक्ष डॉ. डित्रीच नॉर, आययूएफओएसटी २०१८ चे संयोजक डॉ. व्ही. प्रकाश, जगदीश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.