शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

गावठाण विस्ताराचा प्रश्न लालफितीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:57 IST

मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाणातील ३१ डिसेंबर २0१५ पूर्वीची बांधकामे नियमित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. परंतु

अनंत पाटीलनवी मुंबई : मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाणातील ३१ डिसेंबर २0१५ पूर्वीची बांधकामे नियमित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. परंतु या धोरणाला सिडकोने खो घातल्याने प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. गावठाण विस्ताराचा प्रश्न जैसे थे अवस्थेत पडून आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त हवालदिल झाले आहेत. या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आगरी-कोळी युथ फाउंडेशनने ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चिला जात आहे. याच मुद्यावर मागील अनेक निवडणुका लढल्या गेल्या, परंतु तोडगा निघाला नाही. आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांवर आश्वासनांची खैरात करण्यात आली, परंतु प्रश्न मात्र सुटला नाही. सध्याच्या भाजपा सरकारने ३१ डिसेंबर २0१५ पूर्वीच्या बांधकामांना अभय दिले आहे. ही बांधकामे नियमित करण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणाला दिले आहेत, परंतु सिडकोच्या भूमिकेमुळे या प्रक्रियेलाही खीळ बसली आहे.मूळ गावठाणे वगळता शहरातील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे विस्तारित गावठाणात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे सिडकोने अनधिकृत ठरवून त्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.सिडकोच्या आताच्या धोरणामुळे ही बांधकामे नियमित होण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मतावर डोळा ठेवून घोषणाबाजी करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी आता या मुद्यावर राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर शासकीय स्तरावर तोडगा काढावा, अशी मागणी युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी युथ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने सिडकोच्या भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमर ढेकले यांचीभेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले.नवी मुंबईतील सहा गावात एकाच वेळी भूमापन करण्यापेक्षा प्रत्येकी एक गाव निवडा, परंतु सर्वेक्षण हे मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण अशा दोन्ही क्षेत्रासाठी करावे. महापालिका, जिल्हाधिकारी आणि सिडको यांनी एकत्रित बैठक घेऊन एकूण ३0 गावांसाठी तसा कृती आराखडा तयार करून प्रक्रि येला विनाविलंब सुरु वात करावी. प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे, अशी मागणी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी केली आहे.नवी मुंबईतील एकूण ३0 पैकी १४ गावांचे नगरभूमापन झाले आहे. उर्वरित १६ गावांचे नगरभूमापन होणे शिल्लक आहे. यातील काही गावे एमआयडीसी आणि वनखात्याचा भाग आहे, तर काही गावांना अगोदरपासूनच गावठाण नाही. काही गावे स्थलांतरित आहेत. शिल्लक राहिलेल्या १६ गावांपैकी प्रशासकीय अडथळा असलेली ६ गावे प्रथमत: निवडली गेली आहेत. येत्या दोन महिन्यात या गावांचे नगरभूमापन करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याची माहिती ढेकले यांनी शिष्टमंडळाला दिली.यावेळी युथ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने नवी मुंबईतील मूळ आणि विस्तारित गावठाणाचे नगरभूमापन कधी होणार ? असा सवाल उपस्थित केला असता, सध्या फक्त मूळ गावठाणाचे निर्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.