शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

डाळींचे भाव कडाडले

By admin | Updated: October 14, 2015 03:08 IST

डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही

नामदेव मोरे, नवी मुंबई डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. शासनाचे जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारावर नियंत्रण राहिले नसल्यामुळे सामान्य नागरिकांच्या किचनचे बजेट दुप्पट झाले आहे. देशभर जीवनावश्यक वस्तंूचे दर प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांच्या आहारामध्ये रोज समावेश असणाऱ्या डाळी व कडधान्याचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत. सहा महिन्यांमध्ये बाजारभाव जवळपास दुप्पट झाले आहेत. एपीएमसीत जूनमध्ये तूरडाळ ६६ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर १३० ते १७५ पर्यंत गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये १५० ते २०० रुपये किलो दराने चांगली डाळ विकली जात आहे. मूगडाळीचे दरही १२० पेक्षा जास्त झाले आहेत. ५० ते ६० रुपयांना मिळणारी मसूरडाळही ९० ते १०० रुपये दराने विकली जात आहे. अचानक सुरू झालेल्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांना जीवन मुश्कील झाले आहे. डाळीही परवडणाऱ्या दरामध्ये मिळत नसतील तर खायचे काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दिवाळी जवळ आली असून भाव असेच राहिले तर सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये लातुर व मराठवाड्यामधून तूरडाळ येत असते. जगात सर्वाधिक डाळी भारतामध्ये खपतात. देशातील उत्पादन कमी असल्यामुळे तूर, मूग, मटकी, उडीद ही सर्व कडधान्ये आयात करावी लागतात. बर्मा, आॅस्ट्रेलिया व इतर देशातून आवक होत असते. मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला असल्याचे भासविले जात असले तरी या व्यापारामधील काही जाणकार व बाजार समितीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डाळींची मोठ्या प्रमाणात साठेबाजी सुरू आहे. नवी मुंबईमधील एमआयडीसीतील गोडावूनमध्येही साठवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारे साठेबाजी झाली आहे. किरकोळ क्षेत्रामध्ये आता मोठ्या भांडवलदारांनी प्रवेश केला असून त्यांनीही मोठ्या प्रमाणात साठेबाजी केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहा महिन्यांपासून बाजारभाव वाढत असताना शासन मात्र याविषयी काहीच कार्यवाही करत नाही. अद्याप एकाही साठेबाजावर धाड टाकली नसल्यामुळेच सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे.