शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

डाळींचे भाव कडाडले

By admin | Updated: October 14, 2015 03:08 IST

डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही

नामदेव मोरे, नवी मुंबई डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. शासनाचे जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारावर नियंत्रण राहिले नसल्यामुळे सामान्य नागरिकांच्या किचनचे बजेट दुप्पट झाले आहे. देशभर जीवनावश्यक वस्तंूचे दर प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांच्या आहारामध्ये रोज समावेश असणाऱ्या डाळी व कडधान्याचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत. सहा महिन्यांमध्ये बाजारभाव जवळपास दुप्पट झाले आहेत. एपीएमसीत जूनमध्ये तूरडाळ ६६ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर १३० ते १७५ पर्यंत गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये १५० ते २०० रुपये किलो दराने चांगली डाळ विकली जात आहे. मूगडाळीचे दरही १२० पेक्षा जास्त झाले आहेत. ५० ते ६० रुपयांना मिळणारी मसूरडाळही ९० ते १०० रुपये दराने विकली जात आहे. अचानक सुरू झालेल्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांना जीवन मुश्कील झाले आहे. डाळीही परवडणाऱ्या दरामध्ये मिळत नसतील तर खायचे काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दिवाळी जवळ आली असून भाव असेच राहिले तर सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये लातुर व मराठवाड्यामधून तूरडाळ येत असते. जगात सर्वाधिक डाळी भारतामध्ये खपतात. देशातील उत्पादन कमी असल्यामुळे तूर, मूग, मटकी, उडीद ही सर्व कडधान्ये आयात करावी लागतात. बर्मा, आॅस्ट्रेलिया व इतर देशातून आवक होत असते. मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला असल्याचे भासविले जात असले तरी या व्यापारामधील काही जाणकार व बाजार समितीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डाळींची मोठ्या प्रमाणात साठेबाजी सुरू आहे. नवी मुंबईमधील एमआयडीसीतील गोडावूनमध्येही साठवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारे साठेबाजी झाली आहे. किरकोळ क्षेत्रामध्ये आता मोठ्या भांडवलदारांनी प्रवेश केला असून त्यांनीही मोठ्या प्रमाणात साठेबाजी केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहा महिन्यांपासून बाजारभाव वाढत असताना शासन मात्र याविषयी काहीच कार्यवाही करत नाही. अद्याप एकाही साठेबाजावर धाड टाकली नसल्यामुळेच सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे.